शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ढगाळ वातारवण!

By admin | Updated: November 25, 2015 01:56 IST

तूर, हरभरा पिकाला बाधक; किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.

अकोला : मध्यपूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने मागील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असले तरी विदर्भात वातावरण ढगाळ आहे. हे वातावरण तूर, हरभरा पिकांना बाधक ठरणारे असल्याने या पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, तर कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान ता पमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, विदर्भावर असलेले ढगाळ वातावरण पिकांना बाधक ठरण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप पिकांना जबर फटका बसला असून, रब्बी पिकांचे क्षेत्र अर्धेच आहे; पण तूर या वातावरणातही तग धरू न आहे. तुरीच्या पिवळ्य़ा फुलांनी शिवार बहरले असून, अनेक ठिकाणी शेंगा आल्या आहेत. या पिकावरच आता शेतकर्‍यांचा भरवसा आहे; पण शेंगा भरण्याच्या वेळीच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच या पिकावरील किडींचे व्यवस्थापन करताना शेतकरी हैराण आहे. त्यात ढगाळ वातावण रोग, किडींना पोषक असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्यात मदत होणार असल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढणार आहे. का पसावर येत असलेली हिरवी बोंडअळी हरभर्‍यावर येण्याची शक्यता असल्याने या पिकावरचा खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास तूर व हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दररोज शेताचं सर्वेक्षण करण्याची गरज असून, तुरीवर आलेली शेंगा पोखरणारी अळी व हरभर्‍यावरील किडींचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशींनुसार कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी.बी. उंदीरवाडे यांनी दिला.