शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विदर्भात ढगाळ वातारवण!

By admin | Updated: November 25, 2015 01:56 IST

तूर, हरभरा पिकाला बाधक; किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता.

अकोला : मध्यपूर्व अरबी समुद्र ते दक्षिण गुजरात प्रदेशाच्या भागावर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने मागील चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे असले तरी विदर्भात वातावरण ढगाळ आहे. हे वातावरण तूर, हरभरा पिकांना बाधक ठरणारे असल्याने या पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे. वातावरणातील या बदलामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, तर कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात किमान ता पमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नांदेड येथे १६.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दरम्यान, विदर्भावर असलेले ढगाळ वातावरण पिकांना बाधक ठरण्याची शक्यता आहे. यावर्षी पावसाअभावी खरीप पिकांना जबर फटका बसला असून, रब्बी पिकांचे क्षेत्र अर्धेच आहे; पण तूर या वातावरणातही तग धरू न आहे. तुरीच्या पिवळ्य़ा फुलांनी शिवार बहरले असून, अनेक ठिकाणी शेंगा आल्या आहेत. या पिकावरच आता शेतकर्‍यांचा भरवसा आहे; पण शेंगा भरण्याच्या वेळीच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अगोदरच या पिकावरील किडींचे व्यवस्थापन करताना शेतकरी हैराण आहे. त्यात ढगाळ वातावण रोग, किडींना पोषक असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढण्यात मदत होणार असल्याने शेतकर्‍यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढणार आहे. का पसावर येत असलेली हिरवी बोंडअळी हरभर्‍यावर येण्याची शक्यता असल्याने या पिकावरचा खर्च वाढणार आहे. ढगाळ वातावरण असेच चार-पाच दिवस राहिल्यास तूर व हरभरा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी दररोज शेताचं सर्वेक्षण करण्याची गरज असून, तुरीवर आलेली शेंगा पोखरणारी अळी व हरभर्‍यावरील किडींचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशींनुसार कीडनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी.बी. उंदीरवाडे यांनी दिला.