शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

विनय पवार, सारंग अकोळकर फरार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:03 IST

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर

- लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात संशयित फरार सनातन संस्थेचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कºहाड, जि. सातारा) व सारंग दिलीप अकोळकर (रा. चिंतामणी अपार्टमेंट, पुणे) या दोघांना सत्र न्यायालयाने शनिवारी फरार घोषित केले. दरम्यान, समीर गायकवाड याला न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईला जाण्यासाठी मंजुरी देण्यात आली.पानसरे हत्येप्रकरणी शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुनावणी झाली. पवार व अकोळकर यांना अजामीनपात्र वॉरंट लागू केले आहे. ते पोलिसांपासून अस्तित्व लपवित आहेत. अटक टाळण्यासाठी ते फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. या दोघांना फरार घोषित करावे अशी लेखी विनंती सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी केली. ती न्यायाधीश बिले यांनी मान्य केली. हे दोघे पोलिसांत हजर न झाल्यास त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात यावी, अशीही विनंती सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानंतर समीर गायकवाड हा जामिनावर बाहेर आहे. त्याचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. त्यासंबंधी तो १४ ते २६ आॅगस्टपर्यंत मुंबईला जाणार आहे. या कालावधीत येणाºया रविवारी (दि. २०) तो दादर पोलीस ठाण्यात हजेरी देईल, अशी विनंती अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी केली. त्यावर अ‍ॅड. राणे यांनी दादर पोलीस ठाण्यातील हजेरी रेकॉर्ड व मुंबईत तो कुठे राहणार याची संपूर्ण माहिती न्यायालयास सादर करावी, अशी मागणी केली. न्यायाधीश बिले यांनी समीरला मुंबईला जाण्यास मंजुरी दिली.पवार व अकोळकर (कुलकर्णी) यांचा कोल्हापूर गुन्ह्यातील पिस्तूल व मोटारसायकल गायब करण्यामागे हात आहे. पानसरे यांच्या हत्येमध्ये या दोघांसह समीर गायकवाड व डॉ. वीरेंद्र तावडे यांचा मुख्य सहभाग आहे.