शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: April 25, 2016 04:37 IST

तहानलेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

सांगली : तहानलेल्या लातूरला पाणी देत ‘जलदूता’चे काम करणाऱ्या सांगली-मिरजकरांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, याच जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. जत पूर्व भागातील टंचाईग्रस्त परिसराला कर्नाटकच्या ‘हिरेपडसलगी’ योजनेतून पाणी मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाल्याने, आता या गावांना टॅँकरच्या भरवशावरच राहावे लागणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याच्या देव-घेवीच्या चर्चेतून कर्नाटकला देण्यात येणाऱ्या १ टीएमसी पाण्याच्या बदल्यात हिरेपडसलगी योजनेतून जत तालुक्यासाठी १ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कृष्णा नदी कोरडी पडल्याने सध्या हिरेपडसलगी योजना कार्यान्वित नाही. परिणामी, कर्नाटक पाटबंधारे विभागाने पाणी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. याबदल्यात नारायणपूर योजनेतून अक्कलकोटसाठी पाणी मिळणार आहे. राज्यातील एका टंचाईग्रस्त भागाला पाणी मिळणार असले तरी, जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जत तालुक्यातील जलस्रोत आटले आहेत. १२३ गावे आणि वाड्या-वस्त्यांमुळे भौगोलिकदृष्ट्या भलामोठा असलेला जत तालुका कायमस्वरूपी दुष्काळी आहे. सध्या म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ जत तालुक्यातील पश्चिम भागातील केवळ ११ गावांना होत आहे. या भागात असणारे १३ तलाव ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरून घेण्याची कार्यवाही सुरू असली तरी, पूर्व भागातील गावांना मात्र याचा फारसा लाभ होणार नाही.जत तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर बनला असतानाच निसर्ग आणि प्रशासनाच्या अजब फेऱ्यात जत तालुक्यातील जनता अडकली आहे. तालुक्यातील तलाव कोरडे पडत असतानाच, आता कूपनलिका खोदण्यावरही प्रशासनाने निर्बंध लादले आहेत.मुळात राज्यातील पाणीटंचाई असलेल्या भागाला पाणी देण्यात आपण आघाडी घेतली, ही सकारात्मक बाब असली तरी, जत तालुक्यातील टंचाई मिटविण्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे होते. तालुक्यातील अपूर्ण योजनांसाठी १५० कोटींची मागणी केली असताना, केवळ २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ही या भागातील नागरिकांची क्रूर चेष्टा आहे.- सुनील पोतदार, अध्यक्ष, तालुका पाणी संघर्ष समिती