शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

गावक-यांनी वाचवला चोरट्यांचा जीव

By admin | Updated: September 6, 2016 21:36 IST

मध्यरात्री विहिरीत पडलेल्या या चोरट्यांना चार तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली.

विठ्ठल भिसे/ऑनलाइन लोकमत

परभणी, दि. 6 - पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांपासून बचावासाठी धूम ठोकलेले चोरटे अचानक ७० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे घडली. मध्यरात्री विहिरीत पडलेल्या या चोरट्यांना चार तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली. अखेर ग्रामस्थ आणि पोलिसांच्याच मदतीने चारही चोरट्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना घडली.

पाथरी तालुक्यातील कासापुरी फाट्याजवळ बीएसएनएल कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरमधील बॅटऱ्या चोरण्यासाठी काही चोरटे ६ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास मोटारसायकल आणि आॅटोरिक्षा घेऊन घटनास्थळी आले होते. टॉवरवर काम करणारे वॉचमन लक्ष्मण नानाभाऊ भाग्यवंत यांना टॉवरमधील रुममध्ये आवाज आल्याने ते खडबडून जागे झाले. तेव्हा चोरटे टॉवरच्या बॅटऱ्या काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाग्यवंत यांनी सावधगिरी बाळगत कासापुरी गावातील काही ग्रामस्थांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर गावातून सहा मोटारसायकलवर ८ ते १० ग्रामस्थ घटनास्थळाकडे निघाले.

तीन मोटारसायकल कॅनलच्या बाजूने तर तीन मुख्य रस्त्याने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी घटनास्थळापासून पळ काढला. ग्रामस्थांनी मोटारसायकलवर चोरट्यांचा पाठलाग केला़ चोरटे सैरावैरा पळत होते़ काही अंतरावरच कठडे नसलेली विहीर होती़ ही विहीर चोरट्यांच्या लक्षात आली नाही आणि चारही चोरटे ७० फूट खोल विहिरीत कोसळले. दरम्यान, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नवघरे यांनी ही माहिती पोलिसांना दिली़ पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत शंभरहून अधिक ग्रामस्थ एकत्र आले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक जी़ एच़ लेंगुळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी़ आऱ कालापाड, पोलिस नायक यु़एल़ माने, पोकाँ शिंदे, नाईक घटनास्थळी दाखल झाले.

चार चोरटे आले विहिरीबाहेर...

ग्रामस्थांच्या मदतीने चारही चोरट्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. अमजद खान मजीद खान पठाण (मानवत), शेख सोहेल शेख फरीद (परभणी), शेख मोबीन शेख शकील (परभणी) आणि सय्यद समंदर सय्यद सिकंदर अशी चोरट्यांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भितीने तीन ते चार तास विहिरीत...

तब्बल तीन ते चार तास विहिरीतील पाण्यात जीव मुठीत घेऊन राहिलेले चोरटे ग्रामस्थांच्या भितीने बाहेर येत नव्हते़ मात्र पोलिस आले आहेत असे सांगितल्यानंतर चोरटे विहिरीत सोडलेल्या दोरीला पकडून वर आले़ या चोरट्यांनी १८ बॅटऱ्या काढून आणल्या होत्या.