शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

ग्रामस्वच्छता ठप्प

By admin | Updated: February 12, 2016 01:32 IST

आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचा विसर युती सरकारला पडला असून या योजनेचे काम अक्षरश: ठप्प झाले आहे.

- अतुल कुलकर्णी, मुंबईआघाडी सरकारच्या काळात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वच्छता अभियानाचा विसर युती सरकारला पडला असून या योजनेचे काम अक्षरश: ठप्प झाले आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून जिल्हा आणि विभागनिहाय तपासण्या न झाल्याने तत्कालीन मंजुरी असलेल्या कामांना सरकारने स्थगिती देऊन टाकली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी स्वच्छता मोहिम हाती घेतली असली, तरी महाराष्ट्रातील भाजपा सरकारला मात्र ग्रामस्वच्छतेविषयी कमालीची अनास्था असलयाचे दिसून येत आहे. आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेले राष्ट्रसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ठप्प झाल्याची बाब काँग्रेस पक्षाने निदर्शनास आणून दिल्यानंतर सरकारने दोन वर्षाच्या कामांना स्थगिती देऊन टाकली आहे.यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाच्या उपसचिवांनी जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ग्राम स्वच्छता अभियानंतर्गत २०१४-१५ मधील विभागस्तरीय तपासण्या अद्याप झालेल्या नाहीत. त्या लवकर पूर्ण करण्याबाबतही कळविण्यात आले होते, परंतु अद्याप त्या तपासण्या झालेल्या नाहीत. शिवाय २०१५/१६ ची प्रक्रिया करण्यासही विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामांना स्थगिती देण्यात येत आहे. योजनांचे तीनतेराराज्यात ग्राम स्वच्छतेच्या नावाखाली स्वच्छ भारत ग्रामीण मिशन, निर्मल भारत अभियान आणि संत गाडगेबाबा अभियान अशा या तीन योजना होत्या. शिवाय, युती सरकारने शहरी भागासाठी सप्तपदी या नावाने नवीनच योजना सुरु केली. त्यामुळे तीन-तीन योजनांचे रेकॉर्ड जमा करता-करता अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ येऊ लागले. गावे किती स्वच्छ झाली , यापेक्षा सरकारी कार्यालयात कागदांचे ढीग मात्र जमू लागले.कोणी चुका केल्या, कोणी कामचुकारपणा केला हे तपासण्याचे अधिकार सचिवांना दिले जातील. मात्र गाडगेबाबांच्या नावाने सुरु केलेली योजना बंद केली जाणार नाही. ही योजना फक्त पुरस्कारपुरती उरली होती. त्यात दुरुस्त्या करुन ती नव्याने लवकरच सुरु केली जाईल.- बबनराव लोणीकर, पाणी पुरवठा मंत्रीगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे संपूर्ण राज्यात प्रभावी परिणाम दिसले .राज्य सरकारला ही योजना बंदच करायची आहे. स्थगितीचा निर्णय हा योजना बंद करण्याच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल आहे. - खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस