शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

विक्रमगडातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त

By admin | Updated: June 28, 2016 03:17 IST

तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़

राहुल वाडेकर,

विक्रमगड : तालुका व परिसरात भारनियमना व्यतिरिक्त सततच्या होणाऱ्या विजेच्या लंपडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे़ दिवसभर वीज गुल होत असल्यामुळे नागरिकांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत़ प्रत्येक शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली होणारी दिवसभराची वीजकपात आणि इतर दिवशीही वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे येथील जनता बेजार झाली आहे़ खेडयातील आदिवासी सकाळी शेतावर जातो तो रात्रीच परत येतो त्यामुळे जातांना व येतांना त्याला तर वीज दिसतच नाही़ याबाबत महावितरणाकडे वारंवार तक्रारी करुनही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सुधारणा केली जात नाही़ शुक्रवारी दिवसभर दुरुस्तीसाठी वीज कपात केली जाते मग वारंवार वीज खंडीत का होते असा सवाल नागरीक करीत आहेत़ ही समस्या सुटणार तरी कधी असा सवाल केला जात आहे विक्रमगड तालुक्यावर महावितरण इतर तालुक्याच्या तुलनेत अन्याय करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. चोवीस तासांपैकी फक्त काही तासच वीज तीही रात्री उपलब्ध होत आहे. दिवसाच्या वीजपुरवठ्यात सातत्य नसल्याने त्याचा फारसा उपयोग नाही . त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे़ वीजेवर चालणारी उपकरणे बंदच असतात़ तर कधी कमी दाबाच्या प्रवाहामुळे ती चालत नाहीत़ तर कधी दाब वाढल्याने उपकरणे जळतात. विजेचा वापर होत नसतांनाही महावितरण ग्राहकांकडून वीज बील वसूली करीत आहे़ विज बीले वेळेवर भरली नाहीत तर वीज पुरवठा खंडीत केला जातो़ अनेक वेळा वीज खंडीत होत असते. याचा फटका विजेवर व्यवसाय करणाऱ्यांना मोठया प्रमाणात बसलेला असून विक्रमगड तालुक्यांत हजारोंच्या संख्येने झेरॉक्स, कॉम्प्युटर, दुकानदारआहेत़ छोेटेमोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत या समस्येमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही व्यवसायिक दुसऱ्या शहरातस्थलातरीत झाले आहेत़ महावितरणाने विक्रमगडची वीजेची समस्या सोडवावी अशी जनतेची मागणी आहे़प्रत्येक शुक्रवारी विजेच्या असलेल्या समस्या,दुरुस्ती करण्याकरीता दिवसभर विज खंडित करुन भार नियमन केले जाते व त्यामध्ये दुस्तीची कामे केली जात असल्याचे महावितरण कंपनीकडुन सागण्यात येते.मग वारंवार विज खंडीत होण्याचे प्रकार का होतात़ रात्र रात्र लोकांना का जागुन काढावी लागते़ विजेच्या समस्या तशाच का आहेत़- प्रशांत भानुशाली गांव तंटामुक्ती अध्यक्ष विक्रमगड