शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विजयाने मुख्यमंत्र्यांचे भाजपात वजन वाढले

By admin | Updated: February 24, 2017 06:01 IST

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये

यदु जोशी / मुंबईमुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने मिळविलेला विजय, ठाणे वगळता अन्य आठ महापालिकांमध्ये दृष्टिक्षेपात आलेली सत्ता यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपाला नंबर एकचा पक्ष केल्यानंतर आता महापालिका व जिल्हा परिषदांमध्येही फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठे यश मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली आहे. १९९१मध्ये नगरसेवक म्हणून महापालिकेत पाऊल ठेवणारे फडणवीस यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या कारकिर्दीला बुधवारीच २५ वर्षे पूर्ण झाली आणि गुरुवारच्या निकालांनी त्यांना विजयाची भेट मिळाली आहे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ असे वर्णन करण्यात आले होते. गुरुवारच्या निकालानंतर त्या वर्णनाची शाई अधिक गडद झाली आहे. मुंबईच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला थेट अंगावर घेण्याची हिंमत आतापर्यंत भल्याभल्यांनी केलेली नव्हती. काँग्रेसचे बहुतेक मुख्यमंत्रीदेखील मुंबई जणू शिवसेनेची मक्तेदारी असल्याचे समजूनच निवडणुकीकडे पाहत असत. फडणवीस हे असे पहिले मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान दिले आणि भाजपाला शिवसेनेच्या बरोबरीने आणण्यात ते यशस्वी झाले. ‘भाजपाची औकात दाखवू’ आणि ‘परिवर्तन तर होणारच’ असे त्यांनी ठासून सांगितले. मुंबईकरांसमोर विकासाचा आणि पारदर्शकतेचा अजेंडा त्यांनी मांडला आणि राजकीय यशही पक्षाला मिळवून दाखविले. नागपूरचा गड भाजपाने राखला. तेथील दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सलोखा राखत बहुतेक सूत्रे त्यांनी गडकरींच्या हाती दिली आणि स्वत: राज्यातील इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. विशेषत: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसते. ‘मी जिथेही प्रचाराला जातो तिथे लोकांना माझ्यामध्ये एक विश्वास असल्याचे जाणवत होते’ असे मुख्यमंत्री प्रचार संपल्यानंतर सांगत होते. निकालामध्येही तेच दिसून आले आहे. ‘माझा कोणताही गट नाही, तुमचाही तो नसावा, आपल्या सर्वांसाठी पक्ष हेच सर्वस्व असल्याचे सांगत त्यांनी भाजपांतर्गत गटबाजी राहणार नाही, याची काळजी घेतली. एकाच जिल्ह्यात पक्षाचे दोन दिग्गज नेते असतील तर एकाकडे महापालिका आणि दुसऱ्याकडे जिल्हा परिषदेची जबाबदारी देत त्यांनी दोघांमध्ये स्पर्धा लावली.सबकुछ ‘सीएम’महापालिका, जिल्हा परिषदांचे  उमेदवार ठरविण्यापासून प्रत्येक बारीकसारिक गोष्टीत फडणवीस यांनी ‘वर्षा’वर अक्षरश: रात्ररात्र जागून लक्ष घातले. गेले दीड महिना ते पहाटे तीनच्या आधी झोपले नाहीत. छोट्यांपासून मोठी सामाजिक समीकरणे, बेरजेचे राजकारण, मर्यादित ताकद असलेली पण त्या-त्या भागातील निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतील, अशी माणसे जाणीवपूर्वक पक्षात आणण्यापासूनच्या राजकीय खेळींवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले.