शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:52 IST

२५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या : ८०० किलोमीटरची ही यात्रा केली पायी

रायपूर : नियम-संयमाचे पालन करीत गेल्या २५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या करणारे तपस्वी विजय संचेती यांना अलिकडेच कैवल्यधाम तीर्थमध्ये साधू-साध्वींच्या सान्निध्यात ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले.

संचेतींनी आपल्या विशेष तपस्येच्या मालिकेत तीनवेळा उपधान तप केले आहे. श्री शत्रुंजय सिद्ध गिरिराज तीर्थ पालितानाची दोनवेळा नव्वाणु यात्रा केलेली आहे. त्यांनी ही यात्रा एकासना (दिवसभरात फक्त एकदा सात्विक आहार) आणि चौविहार छटसह पूर्ण केली. याशिवाय त्यांनी रायपूरहून श्री सम्मेद शिखरजी तीर्थ, मधुबनची पायी यात्रा केली. ८०० किलोमीटरची ही यात्रा त्यांनी ५० दिवसांत एकासना-आयंबिल-उपवासाने पूर्ण केली.त्यांनी नवपदजीची ओली साडेचार वर्षांत पूर्ण केली. संचेती यांनी साधू-साध्वी यांच्या एक हजार किलोमीटरपर्यंतच्या दीर्घ विहारात त्यांच्यासोबत वास्तव केले आहे.

आचार्य जिन पीयूष सागर सुरीश्वर म.सा., सम्यकरत्न सागर म.सा., महेन्द्र सागर म.सा.,साध्वी शुभंकराश्रीजी म.सा., राजेश श्रीजी म.सा., विधुत प्रभाजी म.सा. आदी ठाणाच्या सान्निध्यात अक्षयतृतीया तप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात जवळपास ८० तपस्वींना सन्मानित केले गेले. सम्यकसागर म.सा. यांनी तपस्वींची प्रशंसा केली. श्री कैवल्यधामतीर्थचे पदाधिकारी सुपारस गोलछा, धरमचंद लुणिया, त्रिलोक बरडिया यांनी तपस्वी विजय संचेती यांचा हार, पगडी देऊन सन्मान केला. यावेळी ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या प्रतिनिधी सोनल शर्मा, राजेश शर्मा, अशोक पटवा, संजय, पूरब श्रेयांश, प्रणय, प्रशांत संचेती, किरण,रिता, अर्पणा संचेती, सुरेश बुरडसह श्री ऋषभ देव जैन मंदिर आणि दादावाडीचे विश्वस्त उपस्थित होते.‘मासक्षमण’ म्हणजे काय?जैन समाजात चातुर्मासदरम्यान ‘मासक्षमण’ची तपस्या अर्थात पूर्ण महिनाभर गरम पाण्याच्या आधारावर उपवास करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचे पालन करताना गेल्या २५ वर्षांपासून संचेती ‘मासक्षमण’ तपस्या करीत आहेत.‘जैन तत्त्वज्ञानानुसर संयम धर्माच्या पालनाने मनुष्य आपल्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घालू शकतो. कारण आयुष्यभर आम्ही भलेही कोणत्याही वस्तूचा उपयोग किंवा उपभोग करणार नाही. परंतु, मनात नेहमी त्या वस्तूंबद्दल ओढ असणेही बंधनाचे कारण आहे आणि स्वत:ला नियम धर्माने परिसीमित करून आम्ही या बंधनातून मुक्ती मिळवू शकतो,’ असे विजय संचेती यांनी सांगितले.