शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:52 IST

२५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या : ८०० किलोमीटरची ही यात्रा केली पायी

रायपूर : नियम-संयमाचे पालन करीत गेल्या २५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या करणारे तपस्वी विजय संचेती यांना अलिकडेच कैवल्यधाम तीर्थमध्ये साधू-साध्वींच्या सान्निध्यात ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले.

संचेतींनी आपल्या विशेष तपस्येच्या मालिकेत तीनवेळा उपधान तप केले आहे. श्री शत्रुंजय सिद्ध गिरिराज तीर्थ पालितानाची दोनवेळा नव्वाणु यात्रा केलेली आहे. त्यांनी ही यात्रा एकासना (दिवसभरात फक्त एकदा सात्विक आहार) आणि चौविहार छटसह पूर्ण केली. याशिवाय त्यांनी रायपूरहून श्री सम्मेद शिखरजी तीर्थ, मधुबनची पायी यात्रा केली. ८०० किलोमीटरची ही यात्रा त्यांनी ५० दिवसांत एकासना-आयंबिल-उपवासाने पूर्ण केली.त्यांनी नवपदजीची ओली साडेचार वर्षांत पूर्ण केली. संचेती यांनी साधू-साध्वी यांच्या एक हजार किलोमीटरपर्यंतच्या दीर्घ विहारात त्यांच्यासोबत वास्तव केले आहे.

आचार्य जिन पीयूष सागर सुरीश्वर म.सा., सम्यकरत्न सागर म.सा., महेन्द्र सागर म.सा.,साध्वी शुभंकराश्रीजी म.सा., राजेश श्रीजी म.सा., विधुत प्रभाजी म.सा. आदी ठाणाच्या सान्निध्यात अक्षयतृतीया तप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात जवळपास ८० तपस्वींना सन्मानित केले गेले. सम्यकसागर म.सा. यांनी तपस्वींची प्रशंसा केली. श्री कैवल्यधामतीर्थचे पदाधिकारी सुपारस गोलछा, धरमचंद लुणिया, त्रिलोक बरडिया यांनी तपस्वी विजय संचेती यांचा हार, पगडी देऊन सन्मान केला. यावेळी ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या प्रतिनिधी सोनल शर्मा, राजेश शर्मा, अशोक पटवा, संजय, पूरब श्रेयांश, प्रणय, प्रशांत संचेती, किरण,रिता, अर्पणा संचेती, सुरेश बुरडसह श्री ऋषभ देव जैन मंदिर आणि दादावाडीचे विश्वस्त उपस्थित होते.‘मासक्षमण’ म्हणजे काय?जैन समाजात चातुर्मासदरम्यान ‘मासक्षमण’ची तपस्या अर्थात पूर्ण महिनाभर गरम पाण्याच्या आधारावर उपवास करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचे पालन करताना गेल्या २५ वर्षांपासून संचेती ‘मासक्षमण’ तपस्या करीत आहेत.‘जैन तत्त्वज्ञानानुसर संयम धर्माच्या पालनाने मनुष्य आपल्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घालू शकतो. कारण आयुष्यभर आम्ही भलेही कोणत्याही वस्तूचा उपयोग किंवा उपभोग करणार नाही. परंतु, मनात नेहमी त्या वस्तूंबद्दल ओढ असणेही बंधनाचे कारण आहे आणि स्वत:ला नियम धर्माने परिसीमित करून आम्ही या बंधनातून मुक्ती मिळवू शकतो,’ असे विजय संचेती यांनी सांगितले.