शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

विजय संचेती ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 05:52 IST

२५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या : ८०० किलोमीटरची ही यात्रा केली पायी

रायपूर : नियम-संयमाचे पालन करीत गेल्या २५ वर्षांपासून निरंतर ‘मासक्षमण’ तपस्या करणारे तपस्वी विजय संचेती यांना अलिकडेच कैवल्यधाम तीर्थमध्ये साधू-साध्वींच्या सान्निध्यात ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले.

संचेतींनी आपल्या विशेष तपस्येच्या मालिकेत तीनवेळा उपधान तप केले आहे. श्री शत्रुंजय सिद्ध गिरिराज तीर्थ पालितानाची दोनवेळा नव्वाणु यात्रा केलेली आहे. त्यांनी ही यात्रा एकासना (दिवसभरात फक्त एकदा सात्विक आहार) आणि चौविहार छटसह पूर्ण केली. याशिवाय त्यांनी रायपूरहून श्री सम्मेद शिखरजी तीर्थ, मधुबनची पायी यात्रा केली. ८०० किलोमीटरची ही यात्रा त्यांनी ५० दिवसांत एकासना-आयंबिल-उपवासाने पूर्ण केली.त्यांनी नवपदजीची ओली साडेचार वर्षांत पूर्ण केली. संचेती यांनी साधू-साध्वी यांच्या एक हजार किलोमीटरपर्यंतच्या दीर्घ विहारात त्यांच्यासोबत वास्तव केले आहे.

आचार्य जिन पीयूष सागर सुरीश्वर म.सा., सम्यकरत्न सागर म.सा., महेन्द्र सागर म.सा.,साध्वी शुभंकराश्रीजी म.सा., राजेश श्रीजी म.सा., विधुत प्रभाजी म.सा. आदी ठाणाच्या सान्निध्यात अक्षयतृतीया तप पारणा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात जवळपास ८० तपस्वींना सन्मानित केले गेले. सम्यकसागर म.सा. यांनी तपस्वींची प्रशंसा केली. श्री कैवल्यधामतीर्थचे पदाधिकारी सुपारस गोलछा, धरमचंद लुणिया, त्रिलोक बरडिया यांनी तपस्वी विजय संचेती यांचा हार, पगडी देऊन सन्मान केला. यावेळी ‘गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्’च्या प्रतिनिधी सोनल शर्मा, राजेश शर्मा, अशोक पटवा, संजय, पूरब श्रेयांश, प्रणय, प्रशांत संचेती, किरण,रिता, अर्पणा संचेती, सुरेश बुरडसह श्री ऋषभ देव जैन मंदिर आणि दादावाडीचे विश्वस्त उपस्थित होते.‘मासक्षमण’ म्हणजे काय?जैन समाजात चातुर्मासदरम्यान ‘मासक्षमण’ची तपस्या अर्थात पूर्ण महिनाभर गरम पाण्याच्या आधारावर उपवास करण्याची परंपरा आहे. त्याच परंपरेचे पालन करताना गेल्या २५ वर्षांपासून संचेती ‘मासक्षमण’ तपस्या करीत आहेत.‘जैन तत्त्वज्ञानानुसर संयम धर्माच्या पालनाने मनुष्य आपल्या स्वच्छंद प्रवृत्तीला लगाम घालू शकतो. कारण आयुष्यभर आम्ही भलेही कोणत्याही वस्तूचा उपयोग किंवा उपभोग करणार नाही. परंतु, मनात नेहमी त्या वस्तूंबद्दल ओढ असणेही बंधनाचे कारण आहे आणि स्वत:ला नियम धर्माने परिसीमित करून आम्ही या बंधनातून मुक्ती मिळवू शकतो,’ असे विजय संचेती यांनी सांगितले.