मुंबई- पावसाची संततधार सलग दोन दिवस सुरू राहिल्यामुळे विहार हा दुसरा तलावही सोमवारी भरून वाहू लागला. या तलावातून मुंबईला दररोज ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्यासाठी आणखी चार दशलक्ष लीटर जलसाठा वाढणे गरजेचे आहे.अपुऱ्या पावसामुळे गेल्या आॅगस्टपासून मुंबईत १५ टक्के पाणीकपात सुरू होती. मात्र १९ जुलै रोजी तुळशी तलाव भरल्यावर ही पाणीकपात लगेचच मागे घेण्यात आली. त्यानंतर आता मुंबईतील दुसरा मोठा विहार तलाव सोमवारी पहाटे ४.२० मिनिटांनी भरून वाहू लागला. त्याचबरोबर जलसाठाही १० लाख दशलक्ष लीटरवर पोहोचला आहे.मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची आवश्यकता असते. १ आॅक्टोबर रोजी एवढा जलसाठा तलावांमध्ये असल्यास पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची चिंता मिटते. त्यामुळे आता तानसा, मोडक सागर आणि भातसा हे तलाव भरून वाहण्याची प्रतीक्षा सुरू आहे.
विहार तलाव भरला
By admin | Updated: August 2, 2016 05:48 IST