शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गारपीट

By admin | Updated: January 2, 2015 01:08 IST

नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावून नववर्षाच्या स्वागताला सलामी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बरसलेल्या अकाली

अकाली पावसाचा फटका : रबीचे नुकसान, गहू पिकासाठी पोषक नागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावून नववर्षाच्या स्वागताला सलामी दिली. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून बरसलेल्या अकाली पावसाने ‘थर्टी फर्स्ट’च्या उत्साहावर विरजण पडले. सर्व जिल्ह्यात बुधवारपासून ढगाळी वातावरण होते.नागपूर शहरात गुरुवारी सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी सकाळी तर, काटोल व कळमेश्वर तालुक्यातील सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. दिवसभर वातावरण ढागाळ होते. गुरुवारी सकाळी नरखेड तालुक्यातील जलालखेडा, मेंढला, थडीपवनी, परिसरात पावासाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास काटोल शहर व नजीकच्या शिवारात पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील येरला, फेटरी शिवारात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे गहू व हरभऱ्याला फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कुही, भिवापूर, उमरेड, मौदा, रामटेक, पारशिवनी, कामठी, सावनेर, हिंगणा तालुक्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते.अमरावती जिल्हा गारठलाअमरावती जिल्ह्यात १ जानेवारी रोजी सरासरी २३.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र पावसाने कोठेही हानीचे वृत्त नाही. पावसामुळे जिल्हा मात्र गारठला आहे. नववर्षाच्या पहाटेवर धुक्याचे सावट होते. हुडहुडीमुळे शहरातील रस्ते ओस पडले होते. दर्यापूर तालुक्यातील घडा सांगवा, अचलपूर तालुक्यातील मल्हारा व कविठा परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास बोराच्या आकाराएवढ्या गारा पडल्या. परिसरात अनेक ठिकाणी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बरीच हानी झाली. अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा ओस पडल्याचे चित्र होते. पाऊस आणि थंडीमुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे टाळले. गहू, हरभरा आणि तूर या पिकांसाठी हा पाऊस पोषक असला तरी कपाशी आणि संत्र्याची या अकाली पावसामुळे हानी झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास गहू आणि हरभऱ्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस अकाली पावसाने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याला झोडपून काढले. उमरखेड तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने गहू, हरभरा आणि केळी पिकाचे नुकसान झाले असून दुपारपर्यंत अनेक तालुक्यात पावसाची रिमझीम सुरूच होती. यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून ढगाळी वातावरण होते. उमरखेड तालुक्यात बुधवारी रात्री २.३० वाजता वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. रात्री ३ वाजताच्या सुमारास सुपारी आणि लिंबाच्या आकाराची तब्बल १५ ते २० मिनिटे गार कोसळली. तर पाऊस सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होता. या गारपिटीचा तडाखा पळशी, नागापूर, कुपटी, पोफाळी, शिवर, सुकळी, जहागीर, नागेशवाडी, चिल्ली या गावांना बसला. हरभरा पिकाचे नुकसान झाले असून हवेमुळे गहू जमिनीवर झोपला. तूर वाकली असून केळी पिकाचे मोठे नुकसान झाले. उमरखेड तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार उमरखेड तालुक्यात १२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील बाभूळगाव, दारव्हा, नेर, कळंब, पुसद, दिग्रस, आर्णी, यवतमाळ या तालुक्यालाही पावसाचा जोरदार फटका बसला. रबी हंगामावर या पावसाचा विपरीत परिणाम होणार असून दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांना अकाली पावसाने पुन्हा संकटात लोटले आहे. वर्धेत पावसामुळे कोसळले विश्रामगृहाचे छतथंडीने हुडहुडी भरविली असताना बुधवारी ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली़ यामुळे घसरलेला पारा पुन्हा १५ अंशांवर पोहोचला व थंडीपासून नागरिकांची सुटका झाली; पण तळेगाव (श्या़पं़) येथे मुसळधार पावसामुळे चणा तसेच अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले़ पावसामुळे विश्रामगृहाचे छतही कोसळले़ रात्रीपासूनच पावसाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजेरी लावली़ बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला रिमझिम पाऊस सकाळी सुरूच होता़ सायंकाळी ५ वाजतानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली़ विद्युल्लतेच्या कडकडाटासह जोरदार नाही; पण पिकांवर अनिष्ट परिणाम होतील, असा पाऊस सुरू होता़ यामुळे कपाशी, तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने तूर, चणा, गहू आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़चंद्रपुरातही पाऊस बल्लारपूरसह चंद्रपूर शहरालाही गुरुवारी पावसाने झोडपले. या अकाली पावसाने रबीचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गडचिरोलीत पाऊसगडचिरोली : गुरूवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास गडचिरोलीत पावसाला सुरूवात झाली. याकाळात गडचिरोली शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून आदिवासी विकास महामंडळाचा उघड्यावर असलेला धानही भिजला.(लोकमत न्यूज नेटवर्क)