शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

VIDEO : जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील जलपातळीत घट

By admin | Updated: August 26, 2016 18:36 IST

गेल्या चार वर्षापासून पडलेल्या अल्प पावसामुळे येथील जगातील दुस-या क्रमांकाच्या खा-या पाण्याच्या सरोवरातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट आली आहे.

- मयूर गोलेच्छा/ ऑनलाइन लोकमत
 
लोणार, दि. 26 - गेल्या चार वर्षापासून पडलेल्या अल्प पावसामुळे येथील जगातील दुस-या क्रमांकाच्या खा-या पाण्याच्या सरोवरातील  पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर घट आली आहे. परिणामी सरोवराच्या काठावर क्षारयुक्त
पदार्थांचे थर दिसायला लागले आहे.
५ लाख वर्षापूर्वी अश्नीपाताने निर्माण झालेले लोणार येथील खा-या पाण्याच्या सरोवराच्या पाण्याच्या पातळीत घट झाल्याने पाण्यात असलेली सरोवरातील मंदिरे उघडी पडली आहे. ऐन पावसाळ्यात ही स्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात या सरोवरातील पाणी आटल्याने सरोवराचे अस्तित्व संपेल काय? अशी चिंता संशोधक व्यक्त करीत आहेत. सातत्याने पडणा-या अल्प पावसामुळे भुगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. परिणामी जलसाठे छोटे पडत चालले आहे. लोणारच्या सरोवरातील खा-या पाण्यात अनेक दुर्मीळ जिवाणूंचे अस्तित्व असून, या जैविक संस्था संशोधनाच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण असल्याचे मत
वारंवार संशोधकांमधून व्यक्त होत आहे. लोणारच्या सरोवरातील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षाही खारट आहे.
निसर्ग निमित्त लोणार सरोवराच्या संवर्धनाकरीता केवळ कागदोपत्रीत घोडे नाचवले जात आहे. शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सरोवराचा भकासपणा वाढत चालला आहे. परिणामी नेहमी पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र राहणा-या लोणार येथे पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पर्यटकांनी लोणारकडे पाठ फिरवील्याचे जाणवत आहे. पर्यटकांअभावी शहरातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहे.