शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नाशकात जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास

By admin | Updated: February 11, 2017 14:03 IST

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 11-  शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची ...

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11-  शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेतून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या एका वाहनाने पेट घेतल्याच्या प्रकारानंतर, आडगाव परीसरात झालेल्या भीषण बस आपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुक व्यवस्थेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केलेली नसल्याचे दिसते. त्यामुळेच विद्यार्थ्यांसोबत असे जिवघेणे अपघात वारंवार होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
 
शहरातील विविध खासगी तथा शासकीय शाळांच्या आवारात सकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेजवळील परिसर व वाहतुक थांबे हे विद्यार्थी व प्रवाश्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असतात. शाळा सुटल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून जबाबदारी संपल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाचे. तर रस्त्यावरील थांब्यांवर राज्य परिवहन मंडळानेही विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोय केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसच्या प्रतिक्षेत रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागते.
 
या परिस्थितीत किमान शहर वाहतूक शाखेने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्याची गरज आहे. पंरतु, विविध मंत्री महोदयांच्या दौऱ्यांमध्ये चौकाचौकात तासनतास ताटकळत उभे राहणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी शाळा भरण्याच्या व सूटण्याच्यावेळी शाळेच्या आवारात आता मात्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या तीनचाकी व चारचाकी वाहनातून अनेकदा असुरक्षित आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे शहरात पेव फुटले आहे.
अशा वाहनचालकांनी विद्यार्थी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवला असताना प्रशासनाचा या प्रकाराकडे मात्र कानाडोळा होतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाने सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करतानांच शहरातील विविध रस्त्यांवर व बस थांब्यांवर सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
एसटीमधून होणाऱ्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ व शहर वाहतूक विभाग नेहमीच कानाडोळा करतात. शासनाने दुजाभाव न करता सर्वांना समान कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून प्रवासी वाहतुकी दरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. 
- संतोश कपोते,नागरिक
 
शाळेच्या वेळेत बसथांब्यांवर महिला व मुलींचे छेडछाडीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.सदर प्रकार रोखण्यासाठी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी बसथांब्याच्या परिसरात पोलीसांचा बंदोबस्त ठेवणेही गरजेचे आहे.
- राजेंद्र गवारे ,नागरिक