शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

VIDEO: नाशकात जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास

By admin | Updated: February 11, 2017 14:03 IST

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 11-  शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची ...

राजू ठाकरे/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11-  शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने गुरुवारी (दि.९) चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेतून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या एका वाहनाने पेट घेतल्याच्या प्रकारानंतर, आडगाव परीसरात झालेल्या भीषण बस आपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाल्यानंतरही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुक व्यवस्थेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केलेली नसल्याचे दिसते. त्यामुळेच विद्यार्थ्यांसोबत असे जिवघेणे अपघात वारंवार होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 
 
शहरातील विविध खासगी तथा शासकीय शाळांच्या आवारात सकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेजवळील परिसर व वाहतुक थांबे हे विद्यार्थी व प्रवाश्यांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असतात. शाळा सुटल्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून जबाबदारी संपल्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाचे. तर रस्त्यावरील थांब्यांवर राज्य परिवहन मंडळानेही विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सोय केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासनतास बसच्या प्रतिक्षेत रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागते.
 
या परिस्थितीत किमान शहर वाहतूक शाखेने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्याची गरज आहे. पंरतु, विविध मंत्री महोदयांच्या दौऱ्यांमध्ये चौकाचौकात तासनतास ताटकळत उभे राहणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी शाळा भरण्याच्या व सूटण्याच्यावेळी शाळेच्या आवारात आता मात्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या तीनचाकी व चारचाकी वाहनातून अनेकदा असुरक्षित आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांचे शहरात पेव फुटले आहे.
अशा वाहनचालकांनी विद्यार्थी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवला असताना प्रशासनाचा या प्रकाराकडे मात्र कानाडोळा होतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाने सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करतानांच शहरातील विविध रस्त्यांवर व बस थांब्यांवर सुरक्षा यंत्रणेचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
एसटीमधून होणाऱ्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतुकीकडे आरटीओ व शहर वाहतूक विभाग नेहमीच कानाडोळा करतात. शासनाने दुजाभाव न करता सर्वांना समान कायदा लागू करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून प्रवासी वाहतुकी दरम्यान होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळविता येईल. 
- संतोश कपोते,नागरिक
 
शाळेच्या वेळेत बसथांब्यांवर महिला व मुलींचे छेडछाडीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहेत.सदर प्रकार रोखण्यासाठी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्यावेळी बसथांब्याच्या परिसरात पोलीसांचा बंदोबस्त ठेवणेही गरजेचे आहे.
- राजेंद्र गवारे ,नागरिक