शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 12, 2016 19:06 IST

५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत

नरेश आसावा/ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 12 - राहत्या गावात अपुऱ्या शिक्षण सुविधांसह बाहेर गावात जाण्यासाठी मजबूत दळणवळण व्यवस्थेच्या अभावामुळे ५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत. ही भीषण स्थिती आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोळा या पुनर्वसित गावातील.अडाण नदी ही जिल्ह्यातील मोठ्या नंद्यापैकी एक असून, तिचे पात्र जवळपास एक हजार फुट आहे. आता याच नदीवर वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर मानोरा तालुक्यात १९७२ मध्ये एका भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करताना मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, घोटी आणि जामदरा, तर कारंजा तालुक्यातील दिघी आणि वाघोळा या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावांचे पुनर्वसन करताना मात्र शासनाने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा ४५ वर्षांतही उपलब्ध केल्या नाहीत. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. त्यांना उपलब्ध नसलेल्या मुख्य सुविधांमध्ये दळणवळणाची मजबूत व्यवस्था आणि शिक्षण, आरोग्य या सुविधांचा समावेश आहे. त्यातच वाघोळा गावातील आबालवृद्धांना तर या सुविधांचा अभावामुळे अनेक भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि शिक्षण सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसांत तर त्यांची परिस्थिती अधिकच भीषण होते. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना यासाठी जीवच धोक्यात घालून वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात.

वाघोळा येथे ८ व्या वर्गापर्यंतचेच शिक्षण असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे किंवा कारंजा येथून येजा करावी लागते. या सर्वांना कारंजा किवा इंझोरी येथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते; परंतु हा प्रवास करण्यासाठी नदीवर पुल नाही. त्यामुळे शाळेत जाताना आणि येतानाही डोंग्यात बसून जीव धोक्यात घालून जावे लागते. नाही म्हणायला येथील विद्यार्थ्यांना इंझोरी येथे जाण्यासाठी एक चार किलोमीटर अंतराचा रस्ता आहे; परंतु त्या रस्त्याची अवस्थाही एवढी दयनीय आहे, की थोडाही पाऊस आला की त्या रस्त्यावर चिखल तयार होऊन पायी चालणेही कठीण होते. मग येथून सायकल किंवा ईतर वाहन न्यावे तरी कसे हा प्रश्न निर्माण होतो. पाऊस थांबल्यानंतर रस्ता सुरळीत होण्याची प्रतिक्षा अनेकदा विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. अशात शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल आणि शाळेत नियमित जायचे असेल, तर येथील विद्यार्थ्यांना सकाळ, सांयकाळ डोंग्यातूनच जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागतो. एखादवेळी अनर्थ झाला, तर चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी होण्याची शक्यता आहे.