शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- विद्यार्थ्यांचा शाळेसाठी नावेतून जीवघेणा प्रवास

By admin | Updated: August 12, 2016 19:06 IST

५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत

नरेश आसावा/ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 12 - राहत्या गावात अपुऱ्या शिक्षण सुविधांसह बाहेर गावात जाण्यासाठी मजबूत दळणवळण व्यवस्थेच्या अभावामुळे ५० हून अधिक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी एक हजार फुटांहून अधिक रूंद असलेल्या अडाण नदीपात्रात डोंग्यात बसून जीवघेणा प्रवास करीत आहेत. ही भीषण स्थिती आहे वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोळा या पुनर्वसित गावातील.अडाण नदी ही जिल्ह्यातील मोठ्या नंद्यापैकी एक असून, तिचे पात्र जवळपास एक हजार फुट आहे. आता याच नदीवर वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर मानोरा तालुक्यात १९७२ मध्ये एका भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आणि या प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहित करताना मानोरा तालुक्यातील म्हसणी, तोरणाळा, घोटी आणि जामदरा, तर कारंजा तालुक्यातील दिघी आणि वाघोळा या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. या गावांचे पुनर्वसन करताना मात्र शासनाने ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेल्या अनेक सुविधा ४५ वर्षांतही उपलब्ध केल्या नाहीत. परिणामी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. त्यांना उपलब्ध नसलेल्या मुख्य सुविधांमध्ये दळणवळणाची मजबूत व्यवस्था आणि शिक्षण, आरोग्य या सुविधांचा समावेश आहे. त्यातच वाघोळा गावातील आबालवृद्धांना तर या सुविधांचा अभावामुळे अनेक भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पुरेशी आरोग्य आणि शिक्षण सुविधा नसल्यामुळे, पावसाळ्याच्या दिवसांत तर त्यांची परिस्थिती अधिकच भीषण होते. नदीचे पात्र काठोकाठ भरल्यामुळे येथील लोकांना कारंजा किंवा नजिकच्या इंझोरी येथे जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करावा लागतो. गर्भवती स्त्रिया आणि विद्यार्थ्यांना यासाठी जीवच धोक्यात घालून वेळोवेळी डोंग्यात बसून जावे लागते. वाघोळा येथील ५७ विद्यार्थी इंझोरी येथे, तर एवढेच कारंजा येथे शिक्षण घेतात.

वाघोळा येथे ८ व्या वर्गापर्यंतचेच शिक्षण असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे किंवा कारंजा येथून येजा करावी लागते. या सर्वांना कारंजा किवा इंझोरी येथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते; परंतु हा प्रवास करण्यासाठी नदीवर पुल नाही. त्यामुळे शाळेत जाताना आणि येतानाही डोंग्यात बसून जीव धोक्यात घालून जावे लागते. नाही म्हणायला येथील विद्यार्थ्यांना इंझोरी येथे जाण्यासाठी एक चार किलोमीटर अंतराचा रस्ता आहे; परंतु त्या रस्त्याची अवस्थाही एवढी दयनीय आहे, की थोडाही पाऊस आला की त्या रस्त्यावर चिखल तयार होऊन पायी चालणेही कठीण होते. मग येथून सायकल किंवा ईतर वाहन न्यावे तरी कसे हा प्रश्न निर्माण होतो. पाऊस थांबल्यानंतर रस्ता सुरळीत होण्याची प्रतिक्षा अनेकदा विद्यार्थ्यांना करावी लागते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होते. अशात शैक्षणिक नुकसान टाळायचे असेल आणि शाळेत नियमित जायचे असेल, तर येथील विद्यार्थ्यांना सकाळ, सांयकाळ डोंग्यातूनच जीव धोक्यात घालत प्रवास करावा लागतो. एखादवेळी अनर्थ झाला, तर चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणात प्राणहानी होण्याची शक्यता आहे.