शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

VIDEO- यवतमाळात मूक आक्रोश

By admin | Updated: September 25, 2016 20:16 IST

राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चांचा धडाका सुरू असतानाही सरकार ठोस पुढाकार घेताना दिसत नाही.

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 25 - राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चांचा धडाका सुरू असतानाही सरकार ठोस पुढाकार घेताना दिसत नाही. त्यामुळे कोपर्डीपासून शेकडो मैल दूर असलेल्या यवतमाळातही रविवारी निघालेला मराठा-कुणबी मूक क्रांती मोर्चा लक्षवेधी ठरला. जिल्ह्यातील लक्षावधी पावलांनी आज यवतमाळचे मुख्य रस्ते तुडविले. पण मोर्चेकऱ्यांच्या चालण्यात शिस्त होती अन् वागण्यात सौहार्द. मूक मोर्चातील प्रत्येक व्यक्तीची शांतता गंभीर जरुर होती, मात्र ती निगरगट्ट व्यवस्थेच्या कानठळ्याही बसवित होती.सोळा तालुक्यांच्या विस्तारित आणि शेतकरीबहुल लोकसंख्येच्या यवतमाळ जिल्ह्यात निघणाऱ्या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांचे जत्थे शहरात दाखल होऊ लागले. पांढरकवडा, घाटंजी, वणी, मारेगाव, झरी, राळेगाव, कळंबमधून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांनी शांतपणे शहरात प्रवेश केला. आर्णी, नेर, पुसद, दिग्रस, महागाव, बाभूळगाव आदी तालुक्यांतील मोर्चेकऱ्यांनीही अत्यंत संयम बाळगून नियोजित रस्त्यानेच समता मैदान गाठले. शहरात येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या वाहनांची गती फार नव्हती. कुठेही नारे नव्हते. घोषणा नव्हत्या. केवळ गाडीवर एक भगवा झेंडा फडफडत होता. बंदोबस्तातील पोलिसांना कोणत्याही मोर्चेकऱ्याशी हुज्जत घालण्याचा प्रसंग उद्भवला नाही. मात्र, शांत असले तरी मोर्चेकऱ्यांची प्रचंड संख्या शहराचे लक्ष वेधत होती. घरा-घरात मोर्चाची चर्चा सुरू झाली. यातूनच मराठा-कुणबी समाजेतर नागरिकांनीही घराबाहेर पडून आपली उत्सूकता व्यक्त केली.सकाळी १० वाजता समता मैदान ह्यफुल्लह्ण झाले. भगवे झेंडे लहरत होते. ध्वनीक्षेपकावरील प्रत्येक सूचनेचे शिस्तबद्ध पालन केले जात होते. त्याचवेळी आलेल्या पावसानेही मोर्चेकऱ्यांचे लक्ष विचलित होऊ शकले नाही. मोर्चाला सुरूवात होताच नियोजित कार्यक्रमाप्रमाणे महिला आणि तरुणींनी मोर्चाचे ह्यसारथ्यह्ण स्वीकारले. त्यांच्या पाठीशी खंबिर पावले टाकत तरुण, प्रौढ, ज्येष्ठ आणि शाळकरी मुलेसुद्धा अगदी शांततेत निघाली. मोर्चा दरम्यान धो-धो पाऊस बरसला. तरीही मोेर्चेकरी जागेवरुन हलायला तयार नव्हता. यवतमाळच्या इतिहासात एवढा मोठा मोर्चा पहिल्यांदाच निघाला.