शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

VIDEO - सावित्री नदीवरचा पूल गेला वाहून, दोन एसटी बससह काही वाहने बेपत्ता

By admin | Updated: August 3, 2016 16:16 IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे.

ऑनलाइन लोकमत

महाड, दि. 3 - मुंबई-गोवा महामार्गावर महाड-पोलादपूर दरम्यानचा  सावित्री नदीवरचा जुना पुल मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्या पुलावरून जाणा-या राजापूर-बोरिवली आणि जयगड- मुंबई या दोन एसटी बससह 8 ते 10 वाहने पुरात वाहून गेली आहेत. या दोन्ही एसटी बसमध्ये 22 प्रवासी होते.  सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता. 

(महाड पूल दुर्घटना - लोकमतने ३ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा)

(VIDEO : महाबळेश्वरमधल्या पावसामुळे महाडमधला पूल कोसळला)

  •  

मुंबई गोवा महामार्गावर राजेवाडी फाट्याजवळ असलेला हा पूल काल रात्री ११.३० च्या सुमारास वाहून गेला. हा पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे पोलादपूर वरून महाड कडे येणारी 10 ते 15 वाहने पुलावरून नदीत कोसळली, आणि पुराच्या पाण्यात वाहून गेली असण्याची भिती व्यक्त होत आहे.  दरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पुण्याहून एनडीआरएफचे बचाव पथक रवाना झाले आहेत. एनडीआरएफच्या टीम्स दाखल झाल्यानंतर ख-या अर्थाने बचावकार्य सुरु होईल. 

 

जयगड-मुंबई आणि राजापुर-मुंबई या दोन बसेसची नोंद पोलादपुर एसटी स्थानकातून पुढे रवाना अशी आहे; मात्र या दोन्ही बसेस अद्याप महाड बस स्थानकात पोहोचलेल्या नाहीत. यावरुनच त्या वाहून गेल्याचे सांगीतले जात आहे. या दोन बसेस बरोबर अन्य खाजगी वाहने नेमकी किती याचा आकडा अद्याप निश्चित होवू शकलेला नाही.

मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा हा पूलच वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे, अशी माहिती मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी घटनास्थळावरून दिली. अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू आॅपरेशन सुरू आहे. महाड आणि पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.

सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी सहकार्य करण्याचं आवाहनही रायगड पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले असून, महाड-पोलादपूरला जोडणारा पूल वाहून गेल्याने रत्नागिरीहून वाहतूक कशेडी बायपास मार्गे वळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पुरात 10 ते 15 गाड्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

काळोख असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती महाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिली आहे. ते स्वतःच्या सहका-यांसह घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवत आहेत. वाहतूक कधी सुरळीत होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो प्रवाशांनी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणं टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. 

रात्रीच्या अंधारात नेमकी किती जीवीतहानी झाली ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्रशासनाकडून जलदगतीने मदत आणि बचावकार्य सुरु राहील असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन सांगितले. 

 

There is no confirmed assessment about casualties since the area is very dark.Administration will ensure speedy rescue & relief operations.