शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- तासगावच्या रथोत्सवाला अलोट गर्दी

By admin | Updated: September 6, 2016 20:32 IST

तासगाव येथील गणपतीचा २३७वा ऐतिहासिक रथोत्सव मंगळवारी भाविकांच्या अलोट गर्दीत आणि उदंड उत्साहात पार पडला.

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 6 - मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात तासगावच्या ऐतिहासिक आणि प्रसिध्द गणपतीचा २३७ वा रथोत्सव मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. पाच तासांहून अधिक काळ सरू असलेल्या रथ यात्रेत राज्यभरातून आलेल्या भाविकांनी हजेरी लावली. गुलालाच्या उधळणीत रंगलेल्या भाविकांच्या उत्साहाचा भक्तीसागर सर्वांनी अनुभवला. 

तासगावचा उजव्या सोंडेचा गणपती राज्यासह देशभर प्रसिध्द आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्यामुळे इथल्या दीड दिवसाच्या गणपती विसर्जन आणि रथोत्सवात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यासह राज्यभरातील गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहाने हजेरी लावली. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानचा यंदाचा २३७ वा रथोत्सव होता. ९६ फूट उंच असणारे गोपुर, तीन मजली आणि तीस फूट उंचीचा, चारचाकी रथदेखील प्रसिध्द आहे. हा रथ गणेशभक्तांनी दोरखंडाच्या साहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे. सार्वजनिक रथोत्सवाची सुरुवात तासगावचे परशुरामभाऊ पटवर्धन यांनी सुरू केली. सर्व जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे. सामाजिक ऐक्याची प्रेरणा देणाऱ्या या उत्सवात रथ ओढण्यासाठी भाविकांत झुंबड उडाली होती. 

मंगळवारी सकाळी राजवाड्यात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन यांच्याहस्ते आरती झाली. दुपारी १२ वाजता वाद्यांच्या गजरात पालखीतून मातीच्या मूर्तीचे व ऐतिहासिक १२५ किलोच्या पंचधातूच्या मूर्तीचे राजवाड्यात आगमन झाले. पालखीसमोर पारंपरिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता, तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा करण्यात आली. आरतीनंतर दोन्ही मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खुंट, फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणांनी सजवला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती.रथासमोर अनेक झांजपथक व गोविंदा मंडळांनी आपल्या कला सादर करताना रथास मानवंदना दिली. मातीच्या व पंचधातूच्या मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या. आरती म्हटल्यानंतर रथोत्सवास सुरुवात झाली. झांज पथकाचा ठेका, मोरयाऽऽ मोरयाऽऽ चा जयघोष व गुलाल, पेढ्यांच्या उधळणीत दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रथ ओढण्यास सुरुवात झाली. रथ ओढताना रथातून भाविकांवर गुलालाची उधळण होत होती. तसेच पेढे, खोबरेही रथ ओढणाऱ्या भाविकांना दिले जात होते. गणपती मंदिरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ रथयात्रा पोहोचल्यानंतर, आरती करुन शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर रथाचा परतीचा प्रवास सुरु झाला. चार तासांच्या मिरवणुकीनंतर तासगावचा ऐतिहासिक २३७ वा रथोत्सव शांततेत पार पडला.