शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मराठा समाजाच्या अभूतपूर्व मोर्चाने मोडले गर्दीचे विक्रम

By admin | Updated: September 3, 2016 19:06 IST

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरातून काढण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि विशाल मोर्चाने जिल्ह्यातील यापूर्वीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले

- ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 3 - कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ शनिवारी परभणी शहरातून काढण्यात आलेल्या अभूतपूर्व आणि विशाल मोर्चाने जिल्ह्यातील यापूर्वीच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. साधारणत: ७ लाख समाजबांधवांनी शिस्तीचे दर्शन घडवित आपल्या मागण्या जिल्हा प्रशासनासमोर मांडल्या. कुठल्याही नेतृत्वाविना एकवटलेल्या मराठा समाज बांधवांनी या मोर्चाच्या निमित्ताने एकीचे दर्शन घडविले. 
 
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जवळगाव नंतर परभणी शहरातही मराठा समाज बांधवांच्या वतीने मागील १५ दिवसांपासून निषेध मोर्चाची जय्यत तयारी केली जात होती. जिल्ह्यातील विविध खेड्यांमधून आणि शेजारील जिल्ह्यांमधून शनिवारी सकाळी ९ वाजेपासूनच समाजबांधव गटा-गटाने दाखल होत होते. शहरातील जिंतूररोडवरील नूतन विद्यालयाच्या परिसरात पुरुषांसाठी आणि महात्मा फुले शाळेच्या मैदानावर महिला एकत्रित आल्या होत्या. या मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. आयोजकांनी स्वतंत्र २ हजार स्वयंसेवकांची यंत्रणा कार्यान्वित केली होती. मोर्चासाठी विक्रमी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन शहरातील मुख्य मार्गावरील जड वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. तसेच शहरामध्येही एकेरी मार्गावरुन वाहतूक सुरु ठेवली होती. 
 
दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. शिस्तबद्धपणे कुठल्याही घोषणा न देता मोर्चेकरी हातात फलक आणि गळ्यामध्ये काळी फित बांधून, हातात भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झाल्या होते. लाखो मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी झाल्याने शहरातील संपूर्ण वातावरण मोर्चामय झाले होते. सव्वा बारा वाजता निघालेला हा मोर्चा जेल कॉर्नर, नानलपेठ, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दुपारी १.०५ वाजता धडकला. मोर्चातील समाज बांधवांची संख्या एवढी मोठी होती की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पहिला मोर्चेकरी पोहचला त्यावेळी शेवटचा मोर्चेकरी ४ कि.मी.दूर असलेल्या नानलपेठ परिसरात होता. त्यामुळे सर्व मोर्चेकऱ्यांना  नियोजितस्थळापर्यंत पोहचता आले नाही. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ध्वनीक्षेपकावरुन मोर्चेकऱ्यांना शांतता आणि शिस्तीचे आवाहन केले जात होते. पुरुष आणि महिला स्वयंसेवक गर्दी होऊ नये, यासाठी कार्यरत होते. मोर्चाच्या अग्रभागी युवती, त्यानंतर महिला त्यांच्यापाठीमागे पुरुषांची रांग होती. सुरुवातीला महिला आणि युवती मोर्चास्थळी दाखल झाल्या. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुने असलेल्या रस्ता आणि मोकळ्या मैदानावर बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली. लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत ‘जय जिजाऊ जय शिवराय’चा जयघोष करण्यात आला. त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. तीन विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर एका विद्यार्थिनीने कोपर्डी येथील घटनेच्या प्रकरणात आपल्या भावना व्यक्त केल्या. पाच विद्यार्थिनी आणि पाच विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांना सादर केले. त्यानंतर निवेदनाचे वाचन करण्यात आले. दुपारी २.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रगीत घेऊन या मोर्चाची सांगता झाली.
मुख्यमंत्री महोदय, मला न्याय द्या...
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाल्यानंतर एका विद्यार्थिनीने कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या भावना उपस्थितांसमोर व्यक्त केल्या. मी श्रद्धा बोलयेत, अशी सुरुवात करीत सांगा मी काय गुन्हा केला होता. मला मोठे व्हायचे होते, आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. परंतु, मला संपविण्यात आले. सांगा माझा काय गुन्हा होता. मुख्यमंत्री महोदय मला न्याय द्या. या राज्यात आमची मुले असुरक्षित आहेत. हा अत्याचार किती दिवस सहन करायचा, अशा भावना व्यक्त करित मुख्यमंत्री महोदय मला न्याय हवा, अशी आर्त मागणी यावेळी करण्यात आली. 
 
मोर्चातून शिस्तीचे आणि एकीचे दर्शन
परभणी शहरातून मराठा समाज बांधवांनी काढलेल्या मोर्चातून शिस्तीचे आणि एकीचे दर्शन घडविले. सात लाखांवर समाजबांधव एकत्र आले असतानाही कुठेही गडबड, गोंधळ झाला नाही. शांततेच्या वातावरणात, कोणत्याही घोषणा न देता या मोर्चेकऱ्यांनी संयमाने आपल्या भावना व्यक्त केल्या. परभणी शहरातून निघालेला हा पहिलाच मोठा मोर्चा ठरला. या मोर्चाने यापूर्वीच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले. पोलिस कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी मोर्चेकऱ्यांना  शिस्तीत मोर्चास्थळापर्यंत वाट काढून दिली. ठिकठिकाणी मानवी साखळी आणि बॅरिकेटस् लावले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या मोर्चाची सांगता झाली. 
 
महिलांचा लक्षणीय सहभाग
औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जळगाव या ठिकाणी निघालेल्या विशाल मोर्चाच्या तुलनेत परभणीच्या मोर्चामध्ये महिलांची अधिक उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्वच गावांमधून मराठा समाजबांधव सहकुटुंब सहभागी झाले होते.  त्यामुळे परभणीचा मोर्चा इतर मोर्चाच्या तुलनेत वेगळा आणि विक्रमी ठरला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधी, व्यावसायिक, अशा सर्वस्तरातील समाज बांधवांनी या मोर्चाला उपस्थिती लावली.