शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

VIDEO- दमणी बनली शोभेची वस्तू !

By admin | Updated: December 29, 2016 17:20 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 29 - स्वातंत्र्यपूर्व काळात दमणी, बैलगाडीच दळणवळणाचे साधन होते. त्याकाळात वाहने नसल्यामुळे गावाला जाण्यासाठी ग्रामीण ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 29 - स्वातंत्र्यपूर्व काळात दमणी, बैलगाडीच दळणवळणाचे साधन होते. त्याकाळात वाहने नसल्यामुळे गावाला जाण्यासाठी ग्रामीण भागात दमणीचा सर्वाधिक वापर व्हायचा. परंतु काळ बदलत गेला. वाहनांची सुविधा निर्माण झाली आणि एकेकाळी दळणवळणाचे मुख्य साधन असलेली दमणी हद्दपार झाली. ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये दमणी ही शोभेची वस्तू बनली आहे. 30 ते 40 वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे दमणी, बैलगाडीतूनच प्रवास करावा लागत असे. ज्याच्या घरी चारचाकी कार तो व्यक्ती श्रीमंत समजला जाई. परंतु एकेकाळी ज्याच्या घरी दर्जेदार बैलजोडी, श्रृंगाराने नटलेली दमणी असायची. तो व्यक्ती गावात श्रीमंत समजला जायचा. लग्नामध्ये नवरदेवाची दमणीतून वरात काढली जात असे. लग्नाला जायचे तर नवरदेवासाठी खास सजविलेली दमणी राहायची आणि वऱ्हाडी मंडळींसाठी बैलगाडी असायची. परंतु काळ बदलत गेला. समाजाचा आणि पर्यायाने रस्त्यांचा विकास झाला. गावे रस्त्यांनी जोडली गेली. चारचाकी, दुचाकी वाहने आली आणि दमणी मागे पडली. आता ही दमणी गावागावांमधील घरांमध्ये एक शोभेची वस्तु बनली आहे. परंतु दमणीचे आकर्षण मात्र कमी झालेले नाही. अनेक ठिकाणी पर्यटनासाठी दमणीचा वापर केला जातो. अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरात एक पुरातन ठेवा म्हणून दमणी जपण्यात येत आहे. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाचे दमणी लक्ष वेधून घेते.

https://www.dailymotion.com/video/x844mv6