शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: August 23, 2016 17:46 IST

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन

सुनील शिंदे

नाशिक, दि. २३ : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारण्यास स्थानिक सरपंचासह ग्रामस्थांनी विरोध केला असून ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.

शासनाने इगतपुरी तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असणा-या मुंढेगाव येथील ग्रामपंचायतच्या ताब्यात असणारी तब्बल चारशे एकर गायरान जमीनवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या विचारधीन आहे. या ठिकाणी चित्रनगरी उभारू नये अशी मागणी मुंढेगाव ग्रामपंचायतसह ग्रामस्थाकडून होत आहे.दरम्यान दुसऱ्या बाजूला शासनाने चित्र नगरी उभारण्यास कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतने आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात महामार्गालगत असणारी गायरान जमीन शासनाने विविध प्रयोजनासाठी वापरली असताना आता शिल्लक असलेल्या चारशे एकर जागेवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या विचारधीन आहे.त्यासाठी कार्यवाही सुरु झाली असून,या बाबीला स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कडवा विरोध दर्शविला आहे.

शासनाने या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी चार हेक्टर, आदिवासी विकास विभागाकरिता २.२० हेक्टर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी १८५० चौरस मीटर भौगोलिक सुधारणा पाणी आणि हायवे साठी १.१०० हेक्टर क्षेत्र, राखीव भूसरल परिवहन भारत सरकार साठी ४९५६ चौरस मिटर व जिल्हास्तरीय व विभाग स्तरीय प्रशिक्षण केंद्र आदी बाबीसाठी शासनाने जागा घेतल्यानंतर उर्विरत जागा चित्रनगरी साठी ताब्यात घेण्याचे शासनाचे धोरण आहे. ही जमीन ताब्यात घेतल्यास ज्या उद्देशासाठी ही जमीन स्थानिक ग्रामपंचायत ने राखून धरली आहे तो संपुष्टात येईल. ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरी साठी वापरू नये अशी मागणी होत आहे.प्रतिक्रिया

श्री.चंद्रकांत गतीर (सरपंच)गायरान असलेल्या या जमिनीला शासनाने विविध उपक्र मासाठी ताब्यात घेतले आहे.यातील अनेक उपक्र म नामधारी राहिले आहेत. फक्त शासनाचे वर्षानुवर्ष फलक लावून ही जमीन आरिक्षत केली आहे.त्यामुळे ही जमीन ग्रामपंचायतच्या वापराविना पडून आहे. याठिकाणी शिल्लक असणा-या जमिनीवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाचे धोरण असून यामुळे परिसरातील पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने चित्रनगरी उभारण्यास ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा कडवा विरोध आहे.श्री.गोविंद गतीर (ग्रामस्थ)इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या सुपीक शेतजमिनी शासनांने विविध प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत.मात्र शिल्लक असलेल्या जागेवरही शासनाचा डोळा असून या जमिनीही ताब्यात घेऊन त्यावर प्रकल्प उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.ही बाब गंभीर असून आता मुंढेगाव च्या साडेचारशे एकर जागा चित्र नगरी साठी शासम ताब्यात घेत आहे.हि जागा गायकुरण असल्याने तालुक्यातील हजारो जनावराना चार्या चा आण िपशुधनाचा पोषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.यामुळे हि चित्रनगरी या ठिकाणी उभारू नये अशी आमची मागणी आहे.श्री.विनोद दळवी(ग्रामस्थ)मुंबई आग्रा महामार्गावर राज्याच्या राजधानी पासून दीड तासाच्या अंतरावर आण िजिल्ह्याच्या ठिकाणापासून वीस किलोमीटर अंतर्रावर हि चित्र नगरी उभारण्याचे शासनाचे धोरण आहे.याबाबत कार्यवाही सुरु झाली असली तरी शासनाने प्रथम ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांच्या शी समन्वय साधने आवश्यक होते.स्थानिकांना विश्वासात न घेता शासनाने एकतर्फी निर्णय घेतला असून शासनाने प्रथम स्थानिकांच्या हरकती जाणून घाव्या व नंतर निर्णय घ्यावा.अन्यथा या ठिकाणी चित्र नगरी होऊ देणार नाही .