शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: लातूर जिल्ह्यात तलावामुळे पर्यटन केंद्राचे स्वरूप

By admin | Updated: August 1, 2016 16:34 IST

लातूरच्या बरोबरीने पाणी टंचाईच्या ‘कळा’ सोसलेल्या उदगीरकरांचा आनंद सध्या ‘धरणात’ मावेनासा झाला आहे

ऑनलाइन लोकमत -
उदगीर, दि. 01 - लातूरच्या बरोबरीने पाणी टंचाईच्या ‘कळा’ सोसलेल्या उदगीरकरांचा आनंद सध्या ‘धरणात’ मावेनासा झाला आहे. जुलै अखेरच्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी धरण तुडूंब भरुन ‘ओव्हरफ्लो’ झाले. धरणातील टंच पाण्याचा हा नजारा ‘याचि देही याचि डोळा’ साठविण्यासाठी प्रकल्पावर दररोज ८ ते १० हजार नागरिकांची हजेरी लागत आहेत.
 
उन्हाळ्यात थेंब थेंब पाण्यासाठी आसुसलेल्या उदगीरवर जुलैअखेर वरुणराजा प्रसन्न झाला. उदगीर शहराला पाणीपुरवठा करणा-या बनशेळकी धरणाच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात तीन दिवसांत जोरदार पाऊस झाला अन् धरण तुडूंब भरले. ही बातमी घागरभर पाण्यासाठी वणवण भटकलेल्या अन् थकलेल्या डोळ्यांनी टँकरची वाट पाहणा-या उदगीरकरांसाठी कोणत्याही ‘ब्रेकिंग’पेक्षा कमी नव्हती. शनिवारी रात्रीतून धरण ओव्हरफ्लो झाले़ हे वृत्त कळताच रविवारी सकाळी ६ वाजेपासूनच धरणाकडे जाणा-या रस्त्यावर वर्दळ झाली. सुट्टीचा दिवस अन् त्यात ही आनंदवार्ता, यामुळे दिवसभर नागरिकांची रीघ लागली.
 
पहिल्याच दिवशी जवळपास १० हजारांहून अधिक नागरिकांनी ‘पाणीपर्यटना’चा आनंद लुटला. हिरव्यागर्द निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धरणातील पाण्याचा नजारा डोळ्यात साठविण्यासाठी झालेली गर्दी कुतूहलाचाही विषय ठरला. डोळे दिपवणारे पाणी पाहून उपस्थित युवकांना पोहण्याचाही मोह आवरत नव्हता. पाण्याचा साठाच नसल्याने निसर्गाच्या कुशीत पोहण्याच्या आनंदापासून पारखे झालेल्या हौशी तरुणांनी बेभान होत प्रकल्पात उड्या टाकल्या. सोमवारी सुट्टी नसतानाही आसपासच्या भागातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने प्रकल्पाकडे धावत होते. एरवी धरणाकडे जाणा-या रस्त्यावर स्मशानशांतता असते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून हा रस्ता वाहनांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गेल्या वर्षभरापासून ‘पाणी पाणी’ करणा-या उदगीरकरांसाठी नजर जाईल तिथवर पाणीच पाणी हा नजारा अविश्वसनीयच वाटत होता. एकंदर भरलेल्या धरण परिसरात फुललेले पाणीपर्यटन हाही एक कुतूहलाचाच विषय बनला आहे.
 
खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले
पाणीपर्यटनासाठी गर्दी होत असल्याने काही व्यवसायिकांनी येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले आहेत. चिवडा विक्री करीत असलेल्या गणी मणियार यांनी सांगितले की, दररोज सायंकाळपर्यंत ८ हजारांवर नागरिक येथे भेट देत आहेत.
 
अगदी अविश्वसनीयच !
दोन घागरी पाण्यासाठी उन्हाळ्यात रात्र रात्र जागून काढल्या. त्याच उदगीरला पाणीपुरवठा करणारे बनशेळकी धरण तुडूंब भरल्याचे ऐकल्यानंतर झालेला आनंद शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही. या आनंदाला वाट करुन देण्यासाठी मग पाय आपोआपच धरणाकडे वळले़ येथील पाणी पाहून अक्षरश: डोळे भरुन आले.
-रमेश कांबळे, उदगीर