शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

VIDEO : असा तयार होतो चक्की गुळ

By admin | Updated: January 18, 2017 10:20 IST

ऑनलाइन लोकमत कोल्हापूर, दि. १८ -  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सर्वाधिक गु-हाळ घरे आहेत.वडणगे गावातील राजेंद्र व संजय पाटील ...

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १८ -  कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात सर्वाधिक गु-हाळ घरे आहेत.वडणगे गावातील राजेंद्र व संजय पाटील या बंधुनी पारंपारिक गुळाची निर्मिती न करता चक्की गुळाचे उत्पादन करून एक वेगळीच वाट धरली आहे या गुळाला मागणी असुन दरही नेहमीच्या गुळापेक्षा जास्त मिळत आहे.आज पाटील बंधुची चौथी पिढी या व्यवसायात असुन त्याना असणारे न्यान,बाजार पेठेतील अनुभव व दक्षता यामुळे त्यानी चक्की गुळ निर्मितीत एक वेगळा ठसा उमटवलेला आहे.

नेहमीचा गुळ तयार करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते. तीच पद्धत पण यागुळा साठी धाडस मेहनत ज्ञान व तत्परता महत्त्वाची असुन रस आठवण्यासाठी नियमित गुळा पेक्षा अर्धा ते पाऊण तास जास्त चुलवाण द्यावे लागते.मात्र हे देत असताना गुळव्या व चुलव्या यांच्यात संवाद असावा लागतो.वरुण गुळव्या ने सांगितले प्रमाणे चुलव्या ने जळण घालुन उष्णता द्यावी लागते.अन्यथा आदण काळे पडुन बाद होऊ शकते चक्की गुळाच्या आदणासाठी सुमारे  तिन ते साडेतीन तासाचा वेळ लागतो.
   या व्यवसायात वेळेला फार महत्त्व आहे. साधारण दोन अडीच तासानंतर वारंवार आदन तपासावे लागते.आदनाची गोळी तयार करुन  ती काईलीवर आपटताच 'खट्ट' असा आवाज आला तरच ते आदन तयार झाले अस समजतात.त्यानंतर मात्र काही वेळातच काईल खाली उतरुन त्याची घोटणी केली जाते घोटणी करुण आदानाची तार धरल्यावर आपल्याला हव्या असलेल्या अकारात तो गुळ भरला जातो.ग्राहकांच्या मागणी प्रमाणे १ ते १०किलो पर्यंतची ठेप केली जाते.
चक्की गुळाची निर्मिती करणारे पाटील बंधु हे तालुक्यातील एकमेव आहेत. ते आपल्या गुर्हाळ घरामध्ये हंगामात त्याना दिवसाला ८ ते ९  टन ऊस लागतो.तर संपूर्ण हंगामात ९००टन ऊसा पासुन ९० हजार कीलो चक्की गुळ तयार केला जातो. या गुळाची मागणी पुर्ण हंगामात रहाते. सर्वसाधारण गुळापेक्षा चक्की गुळाला ४०० ते ५०० रु जादा दर मिळतो.
पाटील बंधु पैकी राजेंद्र पाटील हे मोठे भाऊ त्याना चिक्कि गुळातील ज्ञान असल्याने ते गुर्हाळ घरावरच थांबून असतात.तर संजय पाटील हे बाजारात जातात.बाजार समितीत सर्वच शेतकरी विक्रीसाठी   जात नाहीत त्यामुळे गुळ कोणत्या भावाने गेला हे समजत नाही तिथे शेतकर्याची फसगत होते.मात्र संजय पाटील हे रोजच्या रोज बाजार समितीत जातात.व व्यापारी मागणी नुसार चक्की गुळ तयार केला जातो.
 
चक्की गुळ काढणे हे सोपं नाही.डोळ्यात तेल घालून लक्ष द्याव लागते.कुठल्या वेळी कोणते आदन फेल जाईल सांगता येत नाही.दर हंगामात २.३ आदन फेल जातात पण आमचे युवराज सावंत हे गुळवे धाडस करतात आणि त्याच्या मुळेच आम्ही हे धाडस करु शकतो.
- संजय पाटील 
 
काय आहेत उपयोग..
चिरमुरा लाडु व खाजा..   
कर्नाटक..
करदंट बर्फी 
लोणावळा..
चक्की गुडदाणे.
 
 

https://www.dailymotion.com/video/x844olf