शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

VIDEO - मलाही शाळेत जायचयंय पण...

By admin | Updated: October 19, 2016 18:05 IST

खड्यांशी झुंजत शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आई-वडील उर फुटेस्तोवर काम करत आहेत. मात्र, पोटासाठी भ्रमंती करताना पोटच्या चिमुकल्याच्या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 18 - खड्यांशी झुंजत शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी आई-वडील उर फुटेस्तोवर काम करत आहेत. मात्र, पोटासाठी भ्रमंती करताना पोटच्या चिमुकल्याच्या आयुष्याला शिक्षणाचा रस्ता दाखविणे अशिक्षितपणामुळे शक्य नाही. शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणण्याच्या निव्वळ मोहीमा राबविल्या जातात. पण सुरेशसारख्या अनेकांची अद्यापही फरफटच होत आहे. मुळचा कर्नाटक राज्यातला सुरेश. गावी असताना पहिलीत शाळेत जायचा. पण आई-बाबा पुण्यात काम करण्यासाठी आल्याने आता शाळेत जाता येत नाही. शहरातील विविध रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे त्याचे पालक करत आहेत. मलाही शाळेत जायचंय! पण कसं जायचं, कोणत्या शाळेत मला प्रवेश मिळेल?,असा प्रश्न सुरेश पवार या लहानशा मुलाला पडला आहे. 

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण देणे बंधनाकर झाले आहे. आरटीई अंतर्गत आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर प्रवेश दिले जात आहेत. शालाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले जाते. शालाबाह्य मुलांच्या नोंदणीची मोहिम राबविण्यात आली. परंतु, शासनाचे विविध उपक्रम व योजना कागदावरच आहेत. पुण्यात राज्याच्या शैक्षणिक धोरणाचे आरखडे तयार केले जातात. मात्र, त्याच विद्यानगरीत रस्त्यावर विविध वस्तूंची विक्री करणारी लहान मुले फिरताना दिसतात. पोट भरण्यासाठी शहरात रोजगारासाठी आलेल्या कामगारांची मुले विनाकारण दिवसभर त्यांच्या मागे भटकतात. त्यातीलच सुरेश पवार हा एक शालाबाह्य विद्यार्थी आहे. सुरेशचे कुटुंब काही महिन्यांपूर्वी पुण्यात रोजगारासाठी आले. सध्या तो आपल्या कुटुंबाबरोबर विमाननगर येथे राहतो. त्याचे पालक पुणे स्टेशन,हडपसरसारख्या विविध ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचे काम करण्यासाठी जातात. त्यांच्याबरोबर सुरेशलाही फिरावे लागते. त्यामुळे सुरेश सारख्या शालाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी शासनाकडून कोणतीही जबाबदारी घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच इच्छा असूनही परिसरातील शाळांमधील शिक्षकांना या मुलांना शाळेत दाखल करून घेता येत नाही. त्यामुळे शालाबाह्य मुलांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे,असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.वाचन प्रेरणा दिन ठरला सुरेशसाठी सोनेरी स्वप्नांचावाचन प्रेरणा दिना निमित्त शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. मंगळवार पेठेतील आबासाहेब अत्रे दिन प्रशालेच्या वतीने ग्रंथपाल प्रसाद भडसावळे व शिक्षक हरेश पैठकणकर यांनी रस्त्यावरील मुलांना गोष्टीच्या व चित्रांच्या पुस्तकांचे वाटप केले. त्यावेळी सुरेश पवार सारखी अनेक मुले त्यांना रस्त्यावर फिरताना दिसली. त्यांना पुस्तके भेट दिली. या मुलांनाही त्याचे अप्रुप वाटले. छापील अक्षरांतील गमंत जाणवली. त्यांच्या आई-वडीलांनाही मुलांच्या या नव्या खेळण्याचे कौतुक वाटू लागले. त्यामुळे त्यांनीही मुलांना शाळेत जाण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, या मुलांना शासन नियमावलीनुसार शाळेत कसे दाखल करून घ्यायचे असा प्रश्न आहे. शिक्षण विभागाने ह्यसरलह्णचा बाऊ केला आहे .त्यामुळे शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घेतले जात नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळा सुरू झाल्यानंतर कोणत्याही दिवशी शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून घ्यायला हवे.त्यामुळे अनेक मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत. - हेरंब कुलकर्णी,शिक्षणतज्ज्ञ