शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

VIDEO : गोंदियात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले : दोन पायलट ठार

By admin | Updated: April 26, 2017 17:23 IST

   विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत  गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी ...

 

 विजेंद्र मेश्राम/हुपराज जमईवार/ऑनलाइन लोकमत

 गोंदिया, दि. 26 -  गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ पायलट तरुणी ठार झाले. मृतांमध्ये वरिष्ठ प्रशिक्षक रंजन गुप्ता (४५) आणि प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरूदाससिंह कल्याणी (२४) रा.दिल्ली यांचा समावेश आहे. सकाळी ९.२५ च्या सुमारास ह्यडीए-४२ नाईकह्ण या चार आसनी विमानाने बिरसी विमानळावरून उड्डान केल्यानंतर जवळपास ९.४० पर्यंत हे विमान बिरसी विमानतळावरील एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) रुमच्या संपर्कात होते. परंतू त्यानंतर या विमानाचा संपर्क तुटला. विमान काही विशिष्ट पातळीपेक्षा कमी उंचीवर आल्यास एटीसीसोबत संपर्क तुटतो. त्यामुळे काही वेळात विमान पुन्हा संपर्कात येईल याची एटीसीमधील कर्मचारी वाट पाहात होते. पण १० मिनिटात संपर्क न झाल्यामुळे त्यांनी एनएफटीआय आणि बिरसी विमानतळाच्या संचालकांना माहिती दिली. विमानाच्या शेवटच्या लोकेशनवरून शोधाशोध केली असता हे विमान गोंदियापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवरी-लावणी या गावांजवळील वैनगंगा नदीच्या पात्रात कोसळल्याचे आढळले.ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी नदीचे पात्र लहान आणि पाणीही कमी होते. पण विमान खाली कोसळताच त्याचे तुकडे झाले. त्यातच विमानातील दोन्ही पायलट दबल्या जाऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. रोप-वे च्या तारात अडकले प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान वैनगंगा नदीवरून अत्यंत खालच्या बाजुने उडत येत होते. यामुळे हे विमान वैनगंगा नदीच्या काठावरील दोन तिरांवर असलेल्या देवरी आणि लावणी गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटू नये म्हणून तयार केलेल्या ५० फूट उंचीवरील रोप-वे च्या ताराला स्पर्शुन गेले. यामुळे हे विमान अनियंत्रित होऊन नदीपात्रात कोसळले. विमान कोसळत असताना तिथे कपडे धुवत असलेल्या तीन महिलांपैकी इंतू चैनलाल मेश्राम (१९) ही तरुणी किरकोळ जखमी झाली.घटनास्थळी एकच गर्दी विमान कोसळल्याची माहिती लगतच्या गावकऱ्यांना कळताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. दरम्यान बिरसी विमानतळाचे संचालक राजा रेड्डी यांच्यासह दवनीवाडा ठाण्याचे पोलीस, तिरोडा ठाण्याचे पोलीस तसेच मध्यप्रदेश पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गर्दीला आवरण्यासाठी गोंदियावरून शिघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. दिवसभर गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील लोकांची कोसळलेले विमान पाहण्यासाठी गर्दी कायम होती. दिल्लीचे चौकशी पथक रवानाया छोट्या विमानात ब्लॅक बॉक्स नसतो. त्यामुळे विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्लीवरून तंत्रज्ञांना बोलविले आहे. ते येऊन तपासणी करेपर्यंत विमानाचे अवशेष नदीतून हलविता येणार नाही.- राजा रेड्डी

   
https://www.dailymotion.com/video/x844w7d