शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ: गानसम्राज्ञी आशा भोसले महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

By admin | Updated: April 25, 2016 09:44 IST

चिरतरुण गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई - चिरतरुण गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. लोकमत समूहातर्फे पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. मला अजून महाराष्ट्र सरकारने जीवनगौरव दिलेला नाही, पण लोकमतने दिलेला हा पुरस्कार मला त्याच तोलामोलाचा वाटतो असे सांगत आशाताईंनी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला हे भाग्य असे उद्गारही त्यांनी काढले.
आशाताईंना अर्पण करण्यात आलेले मानपत्र...
लोकमत-जीवन गौरव  आदरणीय आशा भोसले,    मा. दीनानाथांच्या फिरत्या गळ्य़ातून मिळालेलं शब्दांचे तेज आणि सुरांचं देणं ही आपल्याला लाभलेली जन्मदत्त देणगी रसिकांसाठी प्राजक्तासारखी प्रसन्नपणो अथक बरसत राहिली. आपलं मन:पूत बोलणं आणि उत्कट गाणं ही रसिकांच्या मर्मबंधातली ठेव बनली. अनेकानेक भाषाप्रभूंचे शब्द, त्याला कोंदण देणा:या स्वरांचं अनमोल धन आणि विलक्षण जिद्दी मन घेऊन पाश्र्वगायनाच्या क्षेत्रत आपण सहा दशकांहून जास्त काळ अधिराज्य गाजवले. वयाने सहस्रचंद्रदर्शनाचा टप्पा ओलांडल्यानंतरही रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची आपली क्षमता तरूणच राहिली आहे. पहाटेपासून उत्तररात्रीर्पयतच्या प्रत्येक घटकेला तुमच्या मंतरलेल्या आवाजानं कोटय़वधी रसिकांना उभारी दिली. आपला आवाज काळाच्या ओघात संगीताच्या क्षेत्रत झालेल्या प्रत्येक बदलाला व्यापून दशांगुळे उरला. आयुष्याला चैतन्य देणाऱ्या आपल्या स्वराविष्काराच्या सदाबहार गंधात तीन पिढय़ा न्हाऊन निघाल्या. वैयक्तिक संकटांना शूराप्रमाणो सामोरे जाताना सुरांचा दरबार कायम चैतन्यदायी ठेवलात. चांद्यापासून बांद्यार्पयत पसरलेल्या शिवमंगल महाराष्ट्रभूमीला ललामभूत ठरलेले आपले कर्तृत्व वादातीत आणि प्रेरणादायी आहे. सौंदर्य, तारुण्य, मांगल्य, उत्साह, चैतन्य, जिद्द, धैर्य असं खूप काही सळसळत ठेवण्याची किमया आपल्या गात्या गळ्य़ाने लीलया साधली. आपल्या इंद्रधनुषी स्वरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप:यात आणि मनामनात पोहोचलेल्या लोकमतच्या तीन भाषांमधील अक्षरश: कोटी-कोटी वाचकांनी आपल्याला लोकमत जीवनगौरव’ पुरस्काराच्या रूपाने सलाम केला आहे. समर्थाच्या शब्दांत सांगायचे तर.. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हां कारणे ।।