शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

VIDEO : अन् जन्माच्या पाचव्या दिवशीच तो बनला पॅनकार्डधारक

By admin | Updated: March 2, 2017 16:12 IST

ऑनलाइन लोकमत   कोल्हापूर, दि. 2 -  नोटाबंदीचा परिणाम आणि जनतेतून वाढलेली जागरूकता या पार्श्वभूमीवर पॅन कार्डची (पर्मनंट अकाऊंट ...

ऑनलाइन लोकमत  

कोल्हापूर, दि. 2 -  नोटाबंदीचा परिणाम आणि जनतेतून वाढलेली जागरूकता या पार्श्वभूमीवर पॅन कार्डची (पर्मनंट अकाऊंट नंबर) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोल्हापुरातील अमोल शिशुपाल पाटील यांनी त्यांच्या अवघ्या पाच दिवसांच्या नवजात बालकाचेही पॅन कार्ड काढले आहे. हे पॅन कार्ड त्यांना आयकर विभागाकडून प्राप्त झाले. 
 
स्वराज अमोल पाटील असे या नवजात बालकाचे नाव आहे. यापूर्वी बिहार येथील एका बालिकेचे पॅन कार्ड पाचव्या दिवशी काढले होते. त्यानंतर भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले कमीत कमी वयाच्या व्यक्तीचे हे पॅन कार्ड आहे. शुक्रवार पेठ येथील अमोल पाटील हे कर सल्लागार आहेत. पहिल्या मुलीनंतर ९ जानेवारी २०१७ रोजी त्यांच्या पत्नीने  रायबाग (जि. बेळगाव) येथील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला.  
 
यानंतर त्यांनी मुलाच्या जन्मानंतर चौथ्या दिवशी खानापूर तहसीलदार कार्यालयातून स्वराज अमोल पाटील नावाचा दाखला काढला व पाचव्या दिवशी स्वराजचा जन्म दाखला, त्याचे दोन फोटो, आपले आधार कार्ड व पॅन कार्ड अशी कागदपत्रे प्राप्तिकर विभागात दिली. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वराजचे पॅन कार्ड त्यांच्या घरी पोस्टाने आले. आयकर भरण्यासाठी, एलआयसी, पासपोर्ट व ओळखीचा पुराव्यासाठी या पॅन कार्डचा उपयोग होतो.
 
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी केल्यानंतर बँक अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयात पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. या पॅन कार्डमुळे सरकारला देशातील कोणत्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, हे समजू शकणार आहे. त्यामुळे आधार कार्डबरोबर पॅन कार्ड ही सरकारने सक्तीचे केले आहे. या पॅन कार्डचा निश्चितच फायदा होणार  आहे.
 
याबाबत अमोल पाटील म्हणाले, नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने पॅन कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे जन्मानंतर मुलाचे पॅन कार्ड तत्काळ काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार देशभरात किती बालकांची पॅन कार्ड काढली आहेत, याची माहिती इंटरनेटवरून घेतली. त्यावेळी बिहारमधील एका बालिकेचे पॅन कार्ड काढल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मला मुलगा झाल्यावर पाचव्या दिवशी त्याचे पॅन कार्ड काढले. परिणामी महाराष्ट्रातील हे पहिलेच पॅन कार्ड ठरले.
 
पॅन कार्ड काढल्यामुळे मुलाच्या नावे आतापासून नियोजनपूर्वक गुंतवणूक करता येते व त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला व पाल्याला होतो. तसेच करबचतही करता येते.-अमोलदादा पाटील, कोल्हापूर.

https://www.dailymotion.com/video/x844tdf