शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
2
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
3
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
6
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
7
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
8
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
9
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
10
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
11
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
13
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
14
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
15
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
16
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
17
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
18
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
19
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
20
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?

VIDEO- दोन वर्षांत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 16:47 IST

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले ...

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र राज्य शासन २०१९ पर्यंत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी शासनाकडून, शिक्षण, रोजगार, कृषी यासह विविध क्षेत्रासाठी राबविलेल्या योजनांचा लेखाजोखा सादर केला.जळगाव जिल्ह्यातील म्हसावद-बोरनार गटातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री जळगावच्या सभेत उत्तर देतील तसेच सेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर घेतलेल्या भेटीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ते म्हणाले, सध्या मी किती पाणी पितो याकडे अनेकांचे लक्ष असते. मी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विरोधकांना टोला हाणला. ७० वर्षानंतरही मुलभूत समस्या कायममुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण राज्यात फिरत असताना ७० वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत समस्या ग्रामीण भागात कायम आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. त्यामुळे शेतात पाणी असून देखील पिकांना पाणी देता आले नाही.शेतकऱ्यांना ८ हजार कोटींची थेट मदतकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला विचारतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? आम्ही दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलो मात्र तुमच्या ५० वर्षातील नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली.जलयुक्त शिवारमुळे ४ हजार गावे दुष्काळमुक्तराज्यातील २० हजार गावांमध्ये मानवनिर्मित दुष्काळीस्थितीत आहेत. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना आणली. पावसाचे पाणी आपल्याच गावात अडविण्यावर आम्ही भर दिल्याने आतापर्यंत ४ हजार गावेदुष्काळमुक्त झाली आहे. या पावसाळ्यानंतर ११ हजार गावांमधील दुष्काळ संपणार असल्याचे त्यांनी सांगितले.१२ लाख हेक्टरवर संरक्षित सिंचन क्षेत्रआघाडी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही दुष्काळीस्थिती कायम राहिली. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही ३ हजार कोटी तर ५०० कोटींची रक्कम ही लोकसहभागातून उभी केल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी अडविल्यामुळे आज १२ लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार करण्यात आम्हाला यश आले.

https://www.dailymotion.com/video/x844qst