शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

VIDEO- दोन वर्षांत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार- मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2017 16:47 IST

ऑनलाइन लोकमत जळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले ...

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र राज्य शासन २०१९ पर्यंत सर्व गरिबांना हक्काची घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद (ता.जळगाव) येथील प्रचार सभेत सांगितले. यावेळी त्यांनी शासनाकडून, शिक्षण, रोजगार, कृषी यासह विविध क्षेत्रासाठी राबविलेल्या योजनांचा लेखाजोखा सादर केला.जळगाव जिल्ह्यातील म्हसावद-बोरनार गटातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, खासदार ए. टी. पाटील यांच्यासह आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू असलेल्या टीकेला मुख्यमंत्री जळगावच्या सभेत उत्तर देतील तसेच सेनेच्या मंत्र्यांनी बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर घेतलेल्या भेटीबाबत ते बोलतील अशी अपेक्षा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात चकार शब्दही काढला नाही. ते म्हणाले, सध्या मी किती पाणी पितो याकडे अनेकांचे लक्ष असते. मी त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत विरोधकांना टोला हाणला. ७० वर्षानंतरही मुलभूत समस्या कायममुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण राज्यात फिरत असताना ७० वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत समस्या ग्रामीण भागात कायम आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना वीज मिळाली नाही. त्यामुळे शेतात पाणी असून देखील पिकांना पाणी देता आले नाही.शेतकऱ्यांना ८ हजार कोटींची थेट मदतकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आम्हाला विचारतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले? आम्ही दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलो मात्र तुमच्या ५० वर्षातील नाकर्तेपणामुळे आज शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांना ८ हजार कोटी रुपयांची थेट मदत दिली.जलयुक्त शिवारमुळे ४ हजार गावे दुष्काळमुक्तराज्यातील २० हजार गावांमध्ये मानवनिर्मित दुष्काळीस्थितीत आहेत. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना आणली. पावसाचे पाणी आपल्याच गावात अडविण्यावर आम्ही भर दिल्याने आतापर्यंत ४ हजार गावेदुष्काळमुक्त झाली आहे. या पावसाळ्यानंतर ११ हजार गावांमधील दुष्काळ संपणार असल्याचे त्यांनी सांगितले.१२ लाख हेक्टरवर संरक्षित सिंचन क्षेत्रआघाडी शासनाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही दुष्काळीस्थिती कायम राहिली. दुष्काळमुक्तीसाठी आम्ही ३ हजार कोटी तर ५०० कोटींची रक्कम ही लोकसहभागातून उभी केल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अंतर्गत पाणी अडविल्यामुळे आज १२ लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्र तयार करण्यात आम्हाला यश आले.

https://www.dailymotion.com/video/x844qst