शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

व्हिडीओ- वर्षाला चार महिने भामरागड वासीयांवर राहते पुराचे संकट

By admin | Updated: July 24, 2016 18:48 IST

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 24 - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो. येथील नागरिकांचे व व्यापार्‍यांचे पुरामुळे मोठे नुकसान होते. चार महिने ही परिस्थिती कायम राहते. भामरागड परिसरातील गावांचे कायम पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. मात्र या योजनेला शासनस्तरावरून अजूनही मूर्तरूप देण्यात अजूनही यश आलेले नाही.राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या मोठय़ा नद्यांसह बांडिया नदी, तुमरगुडा नाला, ताडगाव नाला हे मोठे जलस्त्रोत आहेत. आलापल्ली-भामरागड हा मुख्य मार्ग असून या मार्गावर नाले व नद्यांवरचे पूल ठेंगणे व अरूंद असल्याने तातडीने पावसाचे पाणी चढते व भामरागडकडे जाणार्‍या नागरिकांना अनेकदा रस्त्यावरच रात्र काढण्याचे प्रसंग येतात. अनेकवेळा हेमलकसा, ताडगाव, पेरमिली येथे नागरिक अडकून पडतात. २00६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी भामरागडच्या पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मागील दहा वर्षांपासून हे आश्‍वासन प्रत्येक सरकार देतच आहे. भामरागडवासीयांना सतत पुराचा फटका बसूनही पालकमंत्र्यांनी या भागात दौरा करून या भागातील नागरिकांचे साधे दु:खही जाणले नाही. अतवृष्टीमुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होते. रस्ते बंद होतात. नागरिकांना समूह निवासी शाळेत हलविले जाते व पूर ओसरला की नागरिक आपल्या घरी परतात. ओसरलेल्या पुरासह रोगराईचाही धोका दरवर्षीभामरागडवासीय अनुभवतात. जनजीवन विस्कळीत होते.गेल्या अनेक वर्षांपासून ३५ हजार लोकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात आहे. भामरागडवासीयांची व्यथा सरकार कधी समजणार, असा प्रश्न या भागात राहणार्‍या जनतेने सरकारला विचारला आहे. अडतानींनी दिला होता उंच जागा शोधून प्रस्तावाचा सल्ला तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन अडतानी यांनी भामरागडच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार केला होता. योग्य उंच जागा निवडावी व ग्रामसभेने मंजुरी देऊन असा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली होती. मात्र हा प्रस्ताव तेव्हापासून धूळ खात पडून आहे. पूर नियंत्रणासाठी उपाययोजनाही आखण्यात आलेल्या नाही. तहसीलदारांच्या उपस्थितीत दरवर्षी बैठक घेतली जाते. बाजारातील दुकानदारांना नोटीस पाठविल्या जातात. पुरामुळे पीडित होणार्‍या कुणालाही नुसानभरपाई दिली जात नाही. अशी परिस्थिती आहे.