शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ- वर्षाला चार महिने भामरागड वासीयांवर राहते पुराचे संकट

By admin | Updated: July 24, 2016 18:48 IST

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो.

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 24 - महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्याला दरवर्षी पुरामुळे मोठा फटका बसतो. येथील नागरिकांचे व व्यापार्‍यांचे पुरामुळे मोठे नुकसान होते. चार महिने ही परिस्थिती कायम राहते. भामरागड परिसरातील गावांचे कायम पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. मात्र या योजनेला शासनस्तरावरून अजूनही मूर्तरूप देण्यात अजूनही यश आलेले नाही.राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती या मोठय़ा नद्यांसह बांडिया नदी, तुमरगुडा नाला, ताडगाव नाला हे मोठे जलस्त्रोत आहेत. आलापल्ली-भामरागड हा मुख्य मार्ग असून या मार्गावर नाले व नद्यांवरचे पूल ठेंगणे व अरूंद असल्याने तातडीने पावसाचे पाणी चढते व भामरागडकडे जाणार्‍या नागरिकांना अनेकदा रस्त्यावरच रात्र काढण्याचे प्रसंग येतात. अनेकवेळा हेमलकसा, ताडगाव, पेरमिली येथे नागरिक अडकून पडतात. २00६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख व उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी भामरागडच्या पूर परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पर्लकोटा नदीचा पूल उंच करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र मागील दहा वर्षांपासून हे आश्‍वासन प्रत्येक सरकार देतच आहे. भामरागडवासीयांना सतत पुराचा फटका बसूनही पालकमंत्र्यांनी या भागात दौरा करून या भागातील नागरिकांचे साधे दु:खही जाणले नाही. अतवृष्टीमुळे अनेकदा जनजीवन विस्कळीत होते. रस्ते बंद होतात. नागरिकांना समूह निवासी शाळेत हलविले जाते व पूर ओसरला की नागरिक आपल्या घरी परतात. ओसरलेल्या पुरासह रोगराईचाही धोका दरवर्षीभामरागडवासीय अनुभवतात. जनजीवन विस्कळीत होते.गेल्या अनेक वर्षांपासून ३५ हजार लोकांच्या जीवाशी हा खेळ खेळला जात आहे. भामरागडवासीयांची व्यथा सरकार कधी समजणार, असा प्रश्न या भागात राहणार्‍या जनतेने सरकारला विचारला आहे. अडतानींनी दिला होता उंच जागा शोधून प्रस्तावाचा सल्ला तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन अडतानी यांनी भामरागडच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार केला होता. योग्य उंच जागा निवडावी व ग्रामसभेने मंजुरी देऊन असा प्रस्ताव पाठवावा, अशी सूचना केली होती. मात्र हा प्रस्ताव तेव्हापासून धूळ खात पडून आहे. पूर नियंत्रणासाठी उपाययोजनाही आखण्यात आलेल्या नाही. तहसीलदारांच्या उपस्थितीत दरवर्षी बैठक घेतली जाते. बाजारातील दुकानदारांना नोटीस पाठविल्या जातात. पुरामुळे पीडित होणार्‍या कुणालाही नुसानभरपाई दिली जात नाही. अशी परिस्थिती आहे.