शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : भाजपा सत्तातूर आणि शेतकरी चिंतातूर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 19, 2017 15:45 IST

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 
- शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
- सत्तेवर लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. 
- रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील
- सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली
- खूप झाली मन कि बात,आता शेतकरी बोलतील
- समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. 
 
- शेतक-यांचा सत्यानाश करुन समृद्धी मार्गाने राजधान्य जवळ येऊ नयेत.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय फायदा. 
- शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी टाहो फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोक पडतात. 
- स्विस बँकेतले 15 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा करा, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो. 
 
-  सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी बांधीलकी.
- मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले
- सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही.
- मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ.
 
 
नाशिक कृषी अधिवेशनात  खासदार राजू शेट्टी म्हणाले
- शेतकऱ्यांवर किडा मुंग्यासारखे मारण्याची वेळ का आली? शेतकरी कर्ज मुक्ती म्हणत नाही, मोफत वीज मागत नाही पण आम्हाला सरकारचे अनैतिक कर्जाचे पाप नको आहे.
- शेतमालाचे भाव ठरविणारा कृषी मूल्य आयोग हा सरकारच्या हातचे बाहुले.
- गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने 2014 मध्ये भाजपा बरोबर त्यांनी स्वामीनाथान आयोगाचे शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले पण अमल नाही.
- मुख्यमंत्री विरोधात असताना आमच्या बरोबर कर्ज मुक्तीसाठी आंदोलन करायचे आता भाषा बदलली, किती अभ्यास करणार कोणत्या देशात जाणार अभ्यासाला.
- कर्ज मुक्ती केली नाही तर, 2019 च्या निवडणुका दूर नाही, शेतकऱ्यांनी सत्तेवर बसविले, पण आता मातीत घालतील.
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 - सरकारच्या तूर डाळ आयात धोरणाने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख 93 हजार कोटींचे नुकसान
-  उद्योगपतींनी 1 लाख 76 कोटीं बुडाले त्यावर का बोलत नाही त्यांना इतक्या कोटी रुपयांचे कर्ज दिले कसे
- 45 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे कर्जही माफ केले नाही
-  22 तारखे पासून पुण्यात महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढणार.
 

https://www.dailymotion.com/video/x844z8c