शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

VIDEO : भाजपा सत्तातूर आणि शेतकरी चिंतातूर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 19, 2017 15:45 IST

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 
- शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
- सत्तेवर लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. 
- रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील
- सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली
- खूप झाली मन कि बात,आता शेतकरी बोलतील
- समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. 
 
- शेतक-यांचा सत्यानाश करुन समृद्धी मार्गाने राजधान्य जवळ येऊ नयेत.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय फायदा. 
- शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी टाहो फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोक पडतात. 
- स्विस बँकेतले 15 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा करा, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो. 
 
-  सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी बांधीलकी.
- मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले
- सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही.
- मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ.
 
 
नाशिक कृषी अधिवेशनात  खासदार राजू शेट्टी म्हणाले
- शेतकऱ्यांवर किडा मुंग्यासारखे मारण्याची वेळ का आली? शेतकरी कर्ज मुक्ती म्हणत नाही, मोफत वीज मागत नाही पण आम्हाला सरकारचे अनैतिक कर्जाचे पाप नको आहे.
- शेतमालाचे भाव ठरविणारा कृषी मूल्य आयोग हा सरकारच्या हातचे बाहुले.
- गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने 2014 मध्ये भाजपा बरोबर त्यांनी स्वामीनाथान आयोगाचे शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले पण अमल नाही.
- मुख्यमंत्री विरोधात असताना आमच्या बरोबर कर्ज मुक्तीसाठी आंदोलन करायचे आता भाषा बदलली, किती अभ्यास करणार कोणत्या देशात जाणार अभ्यासाला.
- कर्ज मुक्ती केली नाही तर, 2019 च्या निवडणुका दूर नाही, शेतकऱ्यांनी सत्तेवर बसविले, पण आता मातीत घालतील.
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 - सरकारच्या तूर डाळ आयात धोरणाने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख 93 हजार कोटींचे नुकसान
-  उद्योगपतींनी 1 लाख 76 कोटीं बुडाले त्यावर का बोलत नाही त्यांना इतक्या कोटी रुपयांचे कर्ज दिले कसे
- 45 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे कर्जही माफ केले नाही
-  22 तारखे पासून पुण्यात महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढणार.
 

https://www.dailymotion.com/video/x844z8c