शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : भाजपा सत्तातूर आणि शेतकरी चिंतातूर - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 19, 2017 15:45 IST

 ऑनलाइन लोकमत  नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी ...

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. 19 - शिवसेनेच्या नाशिक येथील कृषी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री दादा भूसे यांनी प्रास्तविक करताना शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी असल्याचे सांगितले. शेतकरी आत्महत्या दुख:द असून त्यावर कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास मंत्री दादा भूसे, खासदार  संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विजय शिवतारे व शेतकरी यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.
 
 उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे 
- शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. 
- सत्तेवर लाथ मारायला मला एक क्षणाचाही विलंब लागणार नाही. 
- रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील
- सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली
- खूप झाली मन कि बात,आता शेतकरी बोलतील
- समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. 
 
- शेतक-यांचा सत्यानाश करुन समृद्धी मार्गाने राजधान्य जवळ येऊ नयेत.
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा काय फायदा. 
- शेतक-यांनी कर्जमुक्तीसाठी टाहो फोडल्यानंतर तुमच्या खिशाला भोक पडतात. 
- स्विस बँकेतले 15 लाख शेतक-यांच्या खात्यात जमा करा, कर्जमुक्तीची मागणी मागे घेतो. 
 
-  सत्तेत असतानाही विरोध केला कि प्रश्न विचारतात कि सत्तेत असून विरोध कसा, पण आमची बांधिलकी समाज आणि शेतकऱ्यांशी बांधीलकी.
- मुख्यमंत्री विरोधात असताना कर्ज माफी मागायचे आता सत्तेत आल्यानंतर त्यांचे अभ्यासू विद्यार्थ्यांत रूपांतर झाले
- सरकार बदलले पण प्रश्न सुटत नाही.
- मध्यावधीसाठी चाचपणी काय करताय, शेतकरी कर्ज मुक्त करा, माझे सर्व मंत्री सत्ता सोडून बाहेर पडून तुम्हाला सत्तेसाठी पाठिंबा देऊ.
 
 
नाशिक कृषी अधिवेशनात  खासदार राजू शेट्टी म्हणाले
- शेतकऱ्यांवर किडा मुंग्यासारखे मारण्याची वेळ का आली? शेतकरी कर्ज मुक्ती म्हणत नाही, मोफत वीज मागत नाही पण आम्हाला सरकारचे अनैतिक कर्जाचे पाप नको आहे.
- शेतमालाचे भाव ठरविणारा कृषी मूल्य आयोग हा सरकारच्या हातचे बाहुले.
- गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने 2014 मध्ये भाजपा बरोबर त्यांनी स्वामीनाथान आयोगाचे शिफारसी लागू करण्याचे आश्वासन दिले पण अमल नाही.
- मुख्यमंत्री विरोधात असताना आमच्या बरोबर कर्ज मुक्तीसाठी आंदोलन करायचे आता भाषा बदलली, किती अभ्यास करणार कोणत्या देशात जाणार अभ्यासाला.
- कर्ज मुक्ती केली नाही तर, 2019 च्या निवडणुका दूर नाही, शेतकऱ्यांनी सत्तेवर बसविले, पण आता मातीत घालतील.
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 
- समृद्ध मार्गाचे स्वप्न , आधी शेतकरी समृद्ध करा. 
 - सरकारच्या तूर डाळ आयात धोरणाने राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख 93 हजार कोटींचे नुकसान
-  उद्योगपतींनी 1 लाख 76 कोटीं बुडाले त्यावर का बोलत नाही त्यांना इतक्या कोटी रुपयांचे कर्ज दिले कसे
- 45 हजार शेकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांचे कर्जही माफ केले नाही
-  22 तारखे पासून पुण्यात महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढणार.
 

https://www.dailymotion.com/video/x844z8c