शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

VIDEO - अंबाबाई गजारुढ रुपात

By admin | Updated: October 6, 2016 18:19 IST

शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. कामाक्ष राक्षसाच्या वधानंतर आपल्यावर रुसलेल्या

ऑनलाइन लोकमत
 
कोल्हापूर, दि.06 -  शारदीय नवरात्रौत्सवाच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाई गजारुढ रुपात पूजा बांधण्यात आली. कामाक्ष राक्षसाच्या वधानंतर आपल्यावर रुसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी लव्याजम्यानिशी अंबाबाई त्र्यंबोली टेकडीवर जाते अशी या पूजामागील आख्यायिका आहे. यानिमित्त त्र्यंबोली टेकडीवर अंबाबाई व त्र्यंबोली देवी या सखींची भेट घडवण्यात आली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते मयुरी संतोष गुवर या कुमारिकेचे पूजन करण्यात आले व त्यानंतर कुष्मांड भेदन विधी झाला.  
शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमी या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पालखी भालदार, चोपदार, सेवेकरी व श्रीपूजकांच्या शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोली टेकडीवर जाते. अंबाबाईने कोल्लासुराचा नाश केल्यानंतर त्याच्या पत्नीने कामाक्ष नावाच्या पूत्राला जन्म दिला. आपल्या पित्याचा व दैत्यकुळाचा अंबाबाईने व देवतांनी नाश केला याचा त्याला राग हबोता. देवतांवर विजय मिळवण्यासाठी त्याने कपिल महामुनींकडून योगदंड मिळवला. हा यांगदंड कोणावरुनवही फिरवला असता त्याचे प्राणिरुप होईल व जमिनीवर ठेवताच याचे सामर्थ्य नष्ट होई. हा योगदंड घेवून कामाक्ष मुक्तिमंडपात आला येथे देवगणांसहित अंबाबाई कोल्हासुर वधाचे कुष्मांडभेदर करीत होती. एकाच ठिकाणी असलेल्या देवगणांचे कामाक्षाने शेळ््या मेंढ्यात रुपांतर केले. तेंव्हा त्र्यंबोली देवीने वृद्धेचे रुप घेवून कामाक्षाकडून योगदंड हिसकावून घेवून त्याचा वध केला. तिचे हे देवलोकावर ऋण होते. मात्र असुरवधानंतर करण्यात आलेल्या विजयोत्सवात त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेले. यावर रुसुन त्र्यंबोली देवी शहराबाहेरच्या टेकडीवर जावून बसली. ही बाब लक्षात आल्यानंतर अंबाबाई स्वत: आपल्या लव्याजम्यानिशी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी गेली. व त्र्यंबोली देवीच्या इच्छेनुसार टेकडीवर कुष्मांडभेदन (कोहळा) करून दाखवले. ही या पूजेमागील आख्यायिका आहे. ही पूजा दिवाकर ठाणेकर मिलींद दिवाण, प्रसाद ठाणेकर यांनी बांधली. 
या त्र्यंबोली यात्रेनिमित्त सकाळी १० वाजता अंबाबाईचे धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई तसेच जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानीदेवी, छत्रपती शिवाजी महाराज व गुरुमहाराजांच्या पालख्यांनी त्र्यंबोली टेकडीकडे प्रस्थान केले. दुपारी पावणे एक वाजता युवराज संभाजीराजे व यशराजे यांच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारी मयुरी संतोष गुरव हीचे पूजन करण्यात आले. तिच्या हस्ते त्रिशूळाने कोहळा भेदन विधी झाला. त्यानंतर त्र्यंबोली व अंबाबाईची भेट घडवण्यात आली. पंचोपचार पूजा, आरती, आहेराची देवघेव झाली. त्यानंतर सर्व पालख्या परतीच्या मार्गाला लागल्या. दुपारी ४ नंतर अंबाबाईची पालखी पून्हा मंदिरात आली.