शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर करमाळ्यातील शेतक-यांचं आंदोलन मागे

By admin | Updated: June 8, 2017 13:45 IST

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील ...

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8 - मुख्यमंत्री येईपर्यंत मला जाळू नका, अशी अखेरची चिठ्ठी लिहून करमाळा तालुक्यातील वीट गावातील कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमाराची ही घटना आहे. धनाची चंद्रकांत जाधव (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  एकीकडे शेतकऱ्यांचा संप सुरू असताना करमाळा तालुक्यात घडलेल्या या घटनेने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
दरम्यान, धनाजी जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारचा निषेध करण्यासाठी आज करमाळा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांसह शेतक-यांनी घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी करमाळ्यात येऊन कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणीही वीट येथील ग्रामस्थांनी लावून धरली होती. 
 
या पार्श्वभूमीवर, सरकारचा निषेध करण्यासाठी शेतक-यांनी अहमदनगर बायपासवर रास्तारोको आंदोलन केले होते. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.  रास्तारोकोमुळे टेंभुर्णी-अहमदनगर राज्यमार्गावर शेकडो वाहने अडकून पडली होती. रास्ता रोको आंदोलनात जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, काँग्रेसचे आमदार जयवंतराव जगताप सहभागी होते. 
 
आंदोलनाच्या ठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख दाखल झाले. त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. फोनवरुन चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना आश्वासन दिल्यानंतर अखेर गावक-यांनी आंदोलन मागे घेतले. 
 
मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?
धनाजी जाधव अल्पभूधारक शेतकरी असल्यानं त्यांना कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आले. शिवाय, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च व आर्थिक मदतीचं आश्वासनही देण्यात आले. व धनाजी जाधव यांच्या कुटुंबीयांना तातडीनं 1 लाख रुपयांची मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

https://www.dailymotion.com/video/x8452jm