शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ३० लाख पणत्या बनविणारे हात थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2016 12:21 IST

दिवाळीत सर्वात महत्वाच्या असणा-या मातीच्या पणत्यांऐवजी आता आकर्षित, रेखीव दिसणाºया ‘टेराकोटा’च्या पणत्यांना जास्त मागणी आहे.

नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ -   हिंदू संस्कृतीत सर्वात महत्वाचा समजला जाणारा सण दिव्यांचा सण म्हणजे  दिपावली. या सणात मातीच्या पणत्यांच्या महत्वाचे स्थान असून कलात्मक बदलामुळे मात्र ते महत्व बाजारात विक्रीस आलेल्या ‘टेराकोटा’ पणत्यांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. मातीच्या पणत्यांना पाहिजे तशी मागणी नसल्याने जिल्हयात जवळपास ३० लाख पणत्याा बनविणाºया कुंभारांनी पणत्याच बनविणे बंद केले आहे. कुंभारच खुद्द आकर्षित, रेखीव दिसणा-या ‘टेराकोटा’च्या पणत्या खरेदी करुन विक्री करीत आहेत.
वाशिम शहरातील जवळपास ९५ टक्के कुंभारांनी दिवाळीसाठी लागणा-या पणत्या न बनिवता कलकत्ता येथील व्यापा-यांकडून ५०० ते ६०० रुपये हजाराने विकत घेवून त्याचीच ९०० ते १००० रुपये दराने विकून कमाई करीत आहेत. तर काही मोजके कुंभार पारंपारिक व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी काही कुंंभार मात्र आधुनिकतेशी लढाई करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे काही वर्षांनतर मातीच्या पणत्या नामशेष होणार असल्याचे चिन्ह आहे.  वाशिम शहरात ३० कुंभार असून दिवाळीनिमित्त पणत्या, महालक्ष्मी मुर्त्या, खेळभांडी बनवितात.  दिपावलीसाठी काही मोजके कुंभार वगळता अनेकांनी पणत्या बनविणे बंद केले आहे. बाजारात गत ४ ते ५ वर्षापूर्वी मातीच्याच पणत्या विक्रीस यायच्यात.   टेराकोटाच्या पणत्या आल्याने  २५ कुंभारांचे पणत्या बनविणारे हात थांबले आहेत. एक कुंंभार ५० हजार पणत्या बनवून विकायचा आज २५ कुंभारांचे प्रत्येकी ५० हजार पणत्या बनविणे थांबल्याने  १२ लाख ५० हजार पणत्या व ग्रामीण भागातील १६ ते १७ लाख पणत्या बनविणारे कुंभारांचे हात थांबले आहेत.  तरी काही कुंभार पारंपारिक व्यवसायाला टिकवून आधुनिकतेशी लढाई करतांना दिसून येत आहे. दिपावलीत दिवा कोणताही असो, खरे महत्व असते ते प्रज्वलित केलेल्या ज्योतीचे एवढे मात्र नक्की!