शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच

By admin | Updated: September 9, 2014 04:45 IST

विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

 अकोला : विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यापृष्ठभूमिवर संत्रा उत्पादक शेतकर्‍यांनी शासनाला निवेदन देऊन संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर संत्रा फळ पिकाचे क्षेत्र विदर्भात आहे. परंतु सतत बदलत असलेल्या हवामानामुळे, संत्रा फळे व क्षेत्र वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यावर्षीही तेच चित्र असून, जवळपास महिनाभर पाऊसच नसल्याने तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे संत्र्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. मोठय़ा प्रमाणात बहर गळती सुरू झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. डिंक्या या रोगाचा सामना करणार्‍या संत्र्यावर (कोलॅकोट्रायकम) मूळकूजसारखा बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने बहर गळतीत वाढ झालेली आहे. रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत राज्यात फळबाग लागवड योजना राबविण्यात आल्याने फळ क्षेत्र व उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला आहे. राज्यात केळी ८२ हजार हेक्टर, द्राक्ष ९0 हजार हेक्टर, पेरू ३९ हजार हेक्टर, आंबा ४८२ हजार हेक्टर, पपई १0 हजार हेक्टर, लिंबूवर्गीय फळे २७७ हजार हेक्टर, डाळिंब ७८ हजार हेक्टर, चिकू ७३ हजार हेक्टर तर इतर फळ पिके जवळपास ४१८ हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. प्रतिकुल हवामानामुळे संत्रा उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडला आहे. विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संत्र्यांवर येणार्‍या डिंक्या या रोगाचा सामना नेहमीच करीत असतो; तथापि यावेळी वातावरणात बदल झाला असून, सतत बदलत असलेल्या हवामानामुळे बुरशीजन्य कोलॅटोट्रायकम रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगाच्या व्यवस्थापनासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार औषधांची फवारणी करावी.