शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्याचा शेतकरी केंद्र मानून कर्जमुक्ती करा!

By admin | Updated: June 3, 2017 20:12 IST

‘स्वाभिमानी’तर्फे तुपकरांनी दिला प्रस्ताव : निव्वळ शेतीवर अवलंबून असणाºयांचीच कर्जमुक्ती व्हावी!

स्वाभिमानीतर्फे तुपकरांनी दिला प्रस्ताव : निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांचीच कर्जमुक्ती व्हावी!

अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेली आत्मक्लेश पदयात्रा, शेतकऱ्यांचा सुरू असलेला संप यांचा एकत्रित परिणाम म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पुढाकार घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. २००८ मध्ये झालेल्या कर्जमुक्तीचा अनुभव लक्षात घेता सरकाने कर्जमुक्तीचा निर्णय घेताना निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचीच कर्जमुक्ती करावी, तसेच विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या पाहता या विभागातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा सर्वार्थाने लाभ होईल, याचा विचार आधी व्हावा, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाला दिला असल्याची माहिती वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर यांनी दिली. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना.तुपकर म्हणाले की, विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या. या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला दिलासा देण्यासाठी सन २००८ मध्ये झालेल्यांना कर्जमाफी देण्यात आली. या कर्जमाफीचा विदर्भाला केवळ १८ टक्के लाभ झाला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीव गेले व लाभ मात्र उर्वरित महाराष्ट्राला झाला, त्यामुळे यावेळी शासन कर्जमुक्ती देण्याबाबत जो निर्णय घेणार आहे, त्यामध्ये विदर्भ, मराठवाड्याचा शेतकरी केंद्रभूत ठेवून निर्णय घेण्याची मागणी आम्ही केली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाभ नक्कीच मिळावा; मात्र आमच्या विभागावर अन्याय होऊ नये, या भावनेतूनच ही सूचना शासनाला सादर केली असल्याचे तुपकरांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्ती देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली, ही अभिनंदनीय बाब आहे; मात्र कर्जमुक्ती देताना त्या शेतकऱ्याकडे उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन आहे का? याचीही खातरजमा करावी. सरकारी नोकरीवर असणाऱ्या अनेकांकडे सात-बारा आहेत, त्याअर्थी ते शेतकरी आहेत; मात्र त्यांची उपजीविका शेतीवर नाही, अशा लोकांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानीने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमुक्ती देताना ती शेतकऱ्यांसाठी सरसकट असावी, त्यामध्ये कुठल्याही छुप्या अटी व शर्ती नसाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ८ जून रोजी नाशीक येथे बैठक कर्जमुक्तीसाठी सुरू झालेल्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. शेतकरी रस्त्यावर आले आहेत मात्र या आंदोलनाला निर्णायकी नेतृत्व नसल्याने आंदोलन संपविण्याचे प्रयत्न होत आहेत. मुळातच जयाजीरावांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातांना सर्व शेतकरी संघटनांना विश्वासात घेणे गरजेचे होते तसे झाले नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा या संपला पाठींबाच आहे त्यामुळे येत्या ८ जून रोजी खासदार राजु शेट्टी श् कॉ.अशोक ढवळे यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, डाव्या आघाडीचे नेते यांची संयुक्त बैठक नाशीक येथे बोलविण्यात आली आहे. या बैठकीत कर्जमुक्तीसंदर्भातील शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा निश्चीत केली जाणार असल्याची माहिती ना.तुपकर यांनी दिली.