शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी वाऱ्यावर?

By admin | Updated: June 5, 2017 05:00 IST

राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली

योगेश बिडवई । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र विदर्भ, मराठवाड्यात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या व विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. कर्जमाफीत पाच एकरची अट असल्याने सरकारने येथील कोरडवाहू शेतकऱ्याला वाऱ्यावर तर सोडले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी दुष्काळ तर कधी मातीमोल भावामुळे यामुळे विदर्भ, मराठवाड्यात शेतमाल विक्रीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. कर्जबाजारीपणातून सर्वाधिक शेतकरी येथे आत्महत्या होतात. १० एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांची दोन एकर बागायती शेतीशी तुलना करता उत्पन्न तुटपुंजेच निघते. खत, बियाण्यांवर मोठा खर्च केल्यानंतरही अपेक्षित भावाअभावी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही. त्यातुलनेत बागायती शेतकरी ऊस, फळबागा करून लाखोंचे उत्पन्न मिळवू शकतो, असे मराठवाड्यातील कृषी अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी सांगितले. युनिक फाऊंडेशनमार्फत मराठवाड्यात केलेल्या अभ्यासाची आकडेवारीच त्यांनी सांगितली. ते म्हणाले, मराठवाड्यात साधारण ४० टक्के शेतकरी पाच एकरपर्यंत म्हणजे अल्पभूधारक आहेत. २० टक्के ५ ते १० एकर जमीन असलेले मध्यम शेतकरी आहेत. १० एकरपेक्षा जास्त जमीन असलेले १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे जवळपास ६० टक्के शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाही.कोरडवाहू १० एकर शेती असली तरी तोट्यात जाते, असे आम्हाला मराठवाड्यात असंख्य ठिकाणी आढळले. एकीकडे खते, बी-बियाणे यांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे दुष्काळ तर कधी शेतमालाचे घसरलेले भाव या चक्रात शेतकरी अडकतो, असे त्यांनी सांगितले.विदर्भातही पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने जास्त आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी सांगितले. १०० टक्के शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी केली. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. >२००८ मध्ये सात हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. आताचे बाजारभाव व महागाईची तुलना करता ३० हजार कोटींची कर्जमाफी खूप मोठी नाही. बँकांचे ‘स्केल आॅफ फायनान्स’ (प्रती एकरी कर्जवाटप) आता वाढले आहे. त्यामुळे ही रक्कम फुगली आहे. मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीवर टीका करणाऱ्यांनी त्यांचाच मार्ग अवलंबला आहे. - विजय जावंधिया, नेते, शेतकरी संघटना