शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विदर्भ, मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी वाऱ्यावर?

By admin | Updated: June 5, 2017 05:00 IST

राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली

योगेश बिडवई । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा केली. मात्र विदर्भ, मराठवाड्यात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या व विशेषत: कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या उर्वरीत महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. कर्जमाफीत पाच एकरची अट असल्याने सरकारने येथील कोरडवाहू शेतकऱ्याला वाऱ्यावर तर सोडले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी दुष्काळ तर कधी मातीमोल भावामुळे यामुळे विदर्भ, मराठवाड्यात शेतमाल विक्रीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. कर्जबाजारीपणातून सर्वाधिक शेतकरी येथे आत्महत्या होतात. १० एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांची दोन एकर बागायती शेतीशी तुलना करता उत्पन्न तुटपुंजेच निघते. खत, बियाण्यांवर मोठा खर्च केल्यानंतरही अपेक्षित भावाअभावी शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही. त्यातुलनेत बागायती शेतकरी ऊस, फळबागा करून लाखोंचे उत्पन्न मिळवू शकतो, असे मराठवाड्यातील कृषी अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी सांगितले. युनिक फाऊंडेशनमार्फत मराठवाड्यात केलेल्या अभ्यासाची आकडेवारीच त्यांनी सांगितली. ते म्हणाले, मराठवाड्यात साधारण ४० टक्के शेतकरी पाच एकरपर्यंत म्हणजे अल्पभूधारक आहेत. २० टक्के ५ ते १० एकर जमीन असलेले मध्यम शेतकरी आहेत. १० एकरपेक्षा जास्त जमीन असलेले १० ते १५ टक्के आहे. त्यामुळे जवळपास ६० टक्के शेतकरी कर्जमाफी योजनेस पात्र ठरणार नाही.कोरडवाहू १० एकर शेती असली तरी तोट्यात जाते, असे आम्हाला मराठवाड्यात असंख्य ठिकाणी आढळले. एकीकडे खते, बी-बियाणे यांच्या वाढलेल्या किमती तर दुसरीकडे दुष्काळ तर कधी शेतमालाचे घसरलेले भाव या चक्रात शेतकरी अडकतो, असे त्यांनी सांगितले.विदर्भातही पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने जास्त आहे, असे शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी सांगितले. १०० टक्के शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ केले पाहिजे, अशी मागणी केली. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल, याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केली. >२००८ मध्ये सात हजार कोटींची कर्जमाफी झाली होती. आताचे बाजारभाव व महागाईची तुलना करता ३० हजार कोटींची कर्जमाफी खूप मोठी नाही. बँकांचे ‘स्केल आॅफ फायनान्स’ (प्रती एकरी कर्जवाटप) आता वाढले आहे. त्यामुळे ही रक्कम फुगली आहे. मनमोहन सिंगांच्या कर्जमाफीवर टीका करणाऱ्यांनी त्यांचाच मार्ग अवलंबला आहे. - विजय जावंधिया, नेते, शेतकरी संघटना