शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

विदर्भात चाराटंचाईचे चटके!

By admin | Updated: February 15, 2016 02:05 IST

मराठवाड्यात हिरवा चारा पाठवण्याची शक्यता.

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चार्‍याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांत चारा लागवड करण्यात आली आहे. यातील काही हिरवा चारा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाठवण्याची शक्यता आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून, पश्‍चिम विदर्भातील अनेक भागात पाऊस नसल्याने या भागातील गुरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. अकोला जिल्हय़ात डिसेंबर २0१५ पासून चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही (महाबीज) वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान, सलग पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत असून, मागील वर्षी चार्‍याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात पशुधन विकण्याची पाळी आली होती. यावर्षी पुन्हा तेच चित्र निर्माण झाले आहे. परंतु कृषी विभागाने यावर्षी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे गतिमान वैरण विकास राबवला आहे. पूर्व विदर्भातही चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. मागीलवर्षी पाऊस नसल्याने विदर्भासह मराठवाड्यात भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात गुरांना चाराच नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर विदर्भातून काही हिरवा चारा मराठवाड्यात पाठवला जाणार आहे.ज्वारी पेरा कमी झाल्याचा परिणाम विदर्भातील खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम पशू खाद्यावर झाला आहे. यावर उपाय म्हणून गतिमान वैरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे; परंतु त्याचा फायदा किती होतो, याकडे पशूपालक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.