शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

विदर्भात चाराटंचाईचे चटके!

By admin | Updated: February 15, 2016 02:05 IST

मराठवाड्यात हिरवा चारा पाठवण्याची शक्यता.

अकोला : पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चार्‍याची टंचाई भासणार असल्याने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत वर्‍हाडातील पाच जिल्हय़ांत चारा लागवड करण्यात आली आहे. यातील काही हिरवा चारा दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाठवण्याची शक्यता आहे.यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून, पश्‍चिम विदर्भातील अनेक भागात पाऊस नसल्याने या भागातील गुरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. या पार्श्‍वभूमीवर शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यात चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. अकोला जिल्हय़ात डिसेंबर २0१५ पासून चारा लागवड हाती घेण्यात आली आहे. अकोला येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फतही (महाबीज) वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला आहे. दरम्यान, सलग पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत असून, मागील वर्षी चार्‍याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना कवडीमोल भावात पशुधन विकण्याची पाळी आली होती. यावर्षी पुन्हा तेच चित्र निर्माण झाले आहे. परंतु कृषी विभागाने यावर्षी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तेथे गतिमान वैरण विकास राबवला आहे. पूर्व विदर्भातही चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. मागीलवर्षी पाऊस नसल्याने विदर्भासह मराठवाड्यात भीषण दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात गुरांना चाराच नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर विदर्भातून काही हिरवा चारा मराठवाड्यात पाठवला जाणार आहे.ज्वारी पेरा कमी झाल्याचा परिणाम विदर्भातील खरीप व रब्बी ज्वारीचे उत्पादन घटल्याने त्याचा परिणाम पशू खाद्यावर झाला आहे. यावर उपाय म्हणून गतिमान वैरण कार्यक्रम राबविण्यात आला आहे; परंतु त्याचा फायदा किती होतो, याकडे पशूपालक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.