शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विदर्भात बोगस खते व बियाण्यांची भरमार!

By admin | Updated: June 1, 2015 01:42 IST

बोगस खताचा साठा सापडल्यानंतर कृषी विभाग झाला जागा.

अकोला : पश्‍चिम विदर्भात बियाण्यांचा काळाबाजार होत असून, अकोला जिल्हय़ातही यंदा अप्रमाणित सोयाबीनचे बियाणे विक ले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शनिवारी मूर्तिजापूर येथे बोगस खताचा साठा सापडल्यानंतर ही बाब अधोरेखित झाली असून कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. पश्‍चिम विदर्भातील ही पहिलीच कारवाई आहे. गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही कारवाई केली असली तरी बोगस बीटी कापसाचे बियाणे खुलेआम विकणार्‍यांवर केव्हा कारवाई होणार, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ व इतर जिल्हय़ात गेल्यावर्षी अप्रमाणित, बोगस बियाण्यांचा साठा सापडला आहे. बोगस रासायनिक खतेही आढळून आली आहेत; गेल्यावर्षी आकोटात सोयाबनीचे बोगस बियाणे तयार करणारा चक्क कारखानाच निदर्शनास आला होता. यावर्षी मुर्तिजापुरात अकोला जिल्हा कृषी विभाग व गुण नियंत्रण विभागाच्या अधिकार्‍यांना बोगस खताचा साठा आढळून आला आहे. यंदा प्रमाणित सोयाबीन बियाण्यांची वाणवा असल्याने कृषी विभागाला अधिक दक्ष राहावे तर लागणारच आहे, शिवाय शेतकर्‍यांनादेखील काळजीपूर्वक बियाणे खरेदी करावे लागणार आहेत. दरम्यान, शनिवारी सापडलेला बोगस खताचा साठा या ठिकाणाहून किती प्रमाणात विकला गेला, हा मोठा प्रश्न असून, ही खते शोधून काढण्यासाठी अधिकार्‍यांची कसोटी लागणार आहे. लोकमत'ने यासंबंधी वारंवार कृषी विभागाला सतर्क केले आहे, हे विशेष. यासंदर्भात एस आर सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर्षी बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये म्हणून कृषी विभाग दक्ष असल्याचे सांगीतले. बीटी कापसाच्या बियाण्याची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी राहणार आहे. बीटी बियाण्याची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार आहे आणि अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. बोगस खताची विक्री होऊ नये यासाठी कृषी विभाग दक्ष असल्याचा पुर्नउच्चार त्यांनी केला.   कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या मागावर आहे; परंतु शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल न चुकता घेणे गरजेचे आहे. कृषिसेवा केंद्रधारक पावती देण्यास नकार देत असेल, तर शेतकर्‍यांनी १८00२३-३४000 या क्रमांकावर संपर्क साधावा.