शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

विदर्भात भाजपाला सर्वाधिक ४४ जागा

By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST

विदर्भात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विदर्भात झालेल्या जंगी सभा आणि युती फिस्कटल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने भाजपाने विदर्भात कधी नव्हे एवढ्या ४४ जागांवर

प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचा सफायानागपूर : विदर्भात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या विदर्भात झालेल्या जंगी सभा आणि युती फिस्कटल्याने स्वबळावर निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्याने भाजपाने विदर्भात कधी नव्हे एवढ्या ४४ जागांवर कब्जा केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला तब्बल २५ जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे.प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या गृहजिल्ह्यात तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नसून ते खुद्द आपल्या चिरंजीवांनाही विजय मिळवून देऊ शकले नाहीत. चार जिल्ह्यांत काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे यंदा विदर्भातून २८ नवे चेहरे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी ११ जागांवर भाजपाने कब्जा केला आहे. फक्त सावनेर मतदारसंघात काँग्रेसला यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्यात पूर्वी सातपैकी तब्बल पाच आमदार काँग्रेसचे होते. या निवडणुकीत मात्र या पाचही जागा काँग्रेसच्या हातून गेल्या आहेत. येथे शिवसेना एक आणि राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळाले. अमरावतीत भाजपाला चार जागांवर यश मिळाले. काँग्रेस दोन तर दोन जागा अपक्षांच्या पदरी पडल्या. वर्धा जिल्ह्यात भाजपा दोन तर काँग्रेस दोन अशी स्थिती आहे. चंद्रपुरात चार जागी भाजपाला यश मिळाले. वरोऱ्यात शिवसेनेने खाते उघडले तर विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीची जागा जिंकत काँग्रेसची लाज राखली. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात सर्व जागांवर भाजपाचा झेंडा फडकला. गोंदियात तीन जागांवर भाजपाला यश आले असून गोंदियाची जागा काँग्रेसने राखली. अकोला जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांमध्ये विजयश्री मिळवून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. वाशिम जिल्ह्यात भाजपा दोन तर काँग्रेस एक अशी स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात भाजपा तीन, शिवसेना दोन तर काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला आहे.