शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

विदर्भ आणि मराठवाड्यात अनुदानित सोयाबीनचा तुटवडा !

By admin | Updated: June 13, 2016 04:29 IST

शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले.

लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले. त्यामुळे केंद्रावर बियाणांसाठी रांगा लावलेल्या शेतकऱ्यांना हात हलवत परतावे लागले़ औसा तालुक्यात चार वर्षांपासून सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ गेल्या वर्षी पेरण्या झाल्या़ पण उत्पादनच झाले नाही. त्यामुळे यंदा घरगुती बियाणेच नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीनच्या बियाणांच्या शोधात आहेत. महाबीजने औसा तालुक्याला १५७५ क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदानावर देण्याचे जाहीर केले़ त्यामुळे २२५० रुपयांची एक बॅग १५०० रुपयांस मिळत आहे़ शुक्रवारपर्यंत ३४७.४० क्विं़ बियाणे आले आणि लगेच संपले देखील. त्यामुळे शेतकरी कृषी कार्यालय गाठत आहेत आणि तेथे अधिकारी त्यांना उत्तरे देता- देता वैतागले आहेत.देवणी तालुक्यास १०० टन सोयाबीन बियाणे अनुदानावर दिले जाणार असतानाही केवळ १० टनच बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे़ वलांडी येथील लक्ष्मीकांत कृषी केंद्राचे लक्ष्मीकांत बंग म्हणाले, बियाणांची मागणी १०० टनाची होती़ मात्र १० टनच बियाणे आले आहे़ उर्वरित बियाणे सोमवारी उपलब्ध होईल़ (प्रतिनिधी)अमरावती विभागातही टंचाई : अमरावती विभागात यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, सोयाबीनसह उडीद, मूग आणि तूर या पिकांच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्याची टंचाई शेतकऱ्यांना भासत असल्याचे दिसत आहे. प्रस्तावित आकडेवारीनुसार यंदा विभागात पाच लाख क्विंटलहून अधिक सोयाबीन बियाणे, ४२ हजार क्ंिवटल तूर बियाणे, तर प्रत्येकी आठ हजार क्विंटल उडीद आणि मूग बियाण्याची आवश्यकता आहे. तथापि, मागणीच्या तुलनेत सोयाबीनच्या केवळ १ लाख ८० हजार बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.