शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

वडाळे तलावातील गाळाचे प्रकरण विधानसभेत

By admin | Updated: July 31, 2016 02:18 IST

ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे.

पनवेल : ऐतिहासिक वडाळे तलावातून गाळ काढण्यात आला, मात्र त्यांचे वाढीव बिल लावण्यात आल्याचा आरोप होत आहे. या विषयाचे पडसाद थेट विधानसभेत उमटले आहेत. विदर्भातील एका आमदाराने विधानसभेत प्रश्न मांडत या तलावातून नेमका किती गाळ काढला? हा गाळ चर्चेला आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. नेमका गाळ किती काढला, असे प्रश्न विचारत यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. चिमाजी आप्पा आपले सैन्य घेऊन पनवेलला मुक्कामी होते, तेव्हा त्यांनी पनवेलकरांसाठी बक्षीस म्हणून बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण तलाव खोदून दिला. त्याला वडाळे तलाव म्हणून ओळखले जाऊ लागले. बाजूलाच अशोक बाग असल्याने या परिसराचे सौंदर्य अधिक खुलले होते. या तलावाद्वारे एकेकाळी पनवेल शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत होता. कालांतराने वडाळे तलावाकडे दुर्लक्ष होत गेले. पनवेलमधील या सौंदर्यस्थळाच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यामुळे या तलावावर संपूर्ण जलपर्णी पसरते. तळ्यालगत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असून, त्याचे सांडपाणीही तलावात सोडले जात असल्यामुळे हे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाणी तसेच पुरेसा प्राणवायू व सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे या तलावातील शेकडो मासे तसेच अन्य जलचर प्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. बाजूलाच असलेल्या बल्लाळेश्वर मंदिरात येणारे भाविक निर्माल्य आणि इतर वस्तू तलावात टाकतात. तसेच आजूबाजूचा कचरा तलावात जाऊन पाणी प्रदूषित होत आहे. तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने किमान विसर्जन घाटापर्यंत गाळ काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्याकरिता पोकलेन, जेसीबी, डम्पर आणि मजूर असे चार ठेकेदार नियुक्त करण्यात आले. सुरुवातीला लोकसहभागातून हा गाळ काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर बिल लावण्यात आले. तलावातील नेमका किती क्युबिंग मीटर गाळ काढण्यात आला, याबाबत पालिकेकडे नोंद नाही. ५०० डम्पर गाळ काढण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र तलावातून गाळ काढून तो काठावर आणण्यात आला. त्यानंतर तो पायोनीअर आणि हरिओम नगरलगतच्या रस्त्यावर टाकण्यात आला. मात्र त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे तो पुन्हा उचलून दुसरीकडे टाकण्यात आला आहे. नियोजन नसल्याने याचा भुर्दंड पनवेल नगरपालिकेला बसला. वास्तविक पाहता जितके डम्पर दाखविण्यात आलेत, तितका गाळ काढण्यात आलेला नाही.एका आमदाराने हा विषय विधानसभेत उठवल्यानंतर नगर परिषद याबाबत काय उत्तर देते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)