शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठेका अभियंत्यांचा खड्डेप्रकरणी बळी

By admin | Updated: July 20, 2016 03:42 IST

रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेने विरार आणि नालासोपारा विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित केले.

विरार : रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेऊन महापालिकेने विरार आणि नालासोपारा विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित केले. हे तीनही अभियंते ठेका पद्धतीवर काम करणारे आहेत. त्यांच्यावर ठपका ठेऊन जबाबदार असलेल्या कायमस्वरुपी अभियंत्यांना मात्र अभय देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वसई विरार परिसरातील अनेक मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि नागरीक त्रस्त झाले आहेत. याप्रकरणी तक्रारी आल्यानंतर पालिकेने खड्डे बुजवण्यात कुचराई केल्याप्रकरणी अमित पाटील, विजय चव्हाण आणि किरण नाईक या तीन ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या ठेकेदारांना निलंबित केले आहे. अभियंत्यांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खड्डे भरले नाहीत असा ठपका त्यांचवर ठेवण्यात आला आहे.दरम्यान, वसई विरार पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांचे वर्चस्व असून अनेक कायमस्वरुपी अभियंते आणि ठेकेदार यांच्यात बहुतेक ठेक्यांमध्ये छुपी भागीदारी आहे. त्यामुळे बांधकाम खात्यात निकृष्ट कामे, बिले काढताना हेराफेरी होत असल्याचा आरोप केला जातो. मध्यंतरी शिवसेनेचे गटनेते धनंजय गावडे यांनी आधीच झालेल्या कामांच्या पुन्हा निविदा काढल्याची सात प्रकरणे चव्हाट्यावर आणली होती. त्यामुळे ठेकेदारांशी भागीदारी आणि हितसंबंध असलेल्या अभियंत्यांना अभय देऊन ठेका पद्धतीवर काम करणाऱ्या अभियंत्यांचा बळी घेतला गेल्याचा आरोप केला जातो. (प्रतिनिधी)