शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

‘२६/११’तील जखमींना अखेर न्याय!

By admin | Updated: July 7, 2014 04:01 IST

‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी प्रतिकार करताना जखमी झालेल्या मुंबई पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शौर्याला अखेर काही प्रमाणात न्याय मिळाला आहे

जमीर काझी, मुंबई‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी प्रतिकार करताना जखमी झालेल्या मुंबई पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शौर्याला अखेर काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून ‘पराक्रम’पदक मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक व महासंचालक सन्मानचिन्ह या दोन पुरस्कारांच्या दरम्यान ‘पराक्रम’पदक खात्यामध्ये महत्त्वाचे मानले जाते. या शूरवीरांचा प्रस्ताव सव्वा वर्षापासून पोलीस मुख्यालयात धूळ खात पडला होता. महासंचालक संजीव दयाळ यांनी नुकतीच या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलीस निरीक्षक - विजय पोवार, हवालदार - मोहन शिंदे, मुरलीधर झोल, नाईक - निवृत्ती गवाणे, प्रवीण सावंत, कॉन्स्टेबल - बंडू मोरे, शंकर पवार, विनय दंडगव्हाळ, शंकर व्हाडे व संजय गोमांसे अशी पदक मिळालेल्यांची नावे आहेत. यापैकी गवाणे हे सेवानिवृत्त झाले आहेत. आतापर्यंत हे पदक ‘२६/११’ प्रकरणी सहपोलीस आयुक्त (गुन्हा अन्वेषण) सदानंद दाते, निरीक्षक विजय शिंदे व दातेचा आर्डली कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांना मिळाले आहे. मुंबई हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबसह त्याच्या नऊ साथीदारांचा प्रतिकार करताना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद तर अनेक गंभीर जखमी झाले. यापैकी तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, अप्पर आयुक्त अशोक कामटे व निरीक्षक विजय साळसकर व तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर अशोकचक्राने तर निरीक्षक शशिकांत शिंदे यांना मरणोत्तर कीर्तिचक्राने सन्मानित केले गेले. तर त्याच वर्षी अन्य ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपुरस्कार जाहीर केला. त्यानंतर गेल्या वर्षी १५ आॅगस्टला हॉटेल ताज येथे अतिरेक्यांशी प्रतिकार करणाऱ्या अप्पर आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, वरिष्ठ निरीक्षक दीपक ढोलेंसह सहा जणांना विशेष बाब म्हणून तर गेल्या २६ जानेवारीला अप्पर आयुक्त राजवर्धन यांना केंद्राकडून शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. मात्र कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी लढणाऱ्या सदानंद दाते यांच्या पथकातील निरीक्षक विजय पोवार, विजय शिंदे, हवालदार मोहन शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांच्या प्रस्तावाची फाईल वर्षभरापासून महासंचालक कार्यालयात पडून राहिली आहे. त्यांच्याबरोबर पाठवलेल्या आयपीएस राजवर्धन यांचे नाव मात्र पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविण्यात आले. दरम्यानच्या काळात संदानंद दाते, विजय शिंदे व कॉन्स्टेबल टिळेकर यांना २०१२मध्ये तत्कालीन महासंचालक एस. सुब्रह्मण्यम यांनी ‘पराक्रम’पदक जाहीर केले होते. त्याच धर्तीवर उपरोक्त १० जणांचा प्रस्ताव गेल्या वर्षी मार्च महिन्यात महासंचालकांकडे पाठवला होता.