शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

पंचवीस वर्षांत १३0 मजुरांचे बळी

By admin | Updated: April 29, 2016 03:42 IST

शहरात एकूण ८0 दगडखाणी आहेत. दगडखाणीत मागील २५ वर्षांत झालेल्या अपघातांत जवळपास १३0 मजुरांचे बळी गेले आहेत.

कमलाकर कांबळे

नवी मुंबई-शहरात एकूण ८0 दगडखाणी आहेत. दगडखाणीत मागील २५ वर्षांत झालेल्या अपघातांत जवळपास १३0 मजुरांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाविषयी काम करणाऱ्या संस्थांनी मृत्यूचे तांडव करणाऱ्या या दगडखाणींच्या विरोधात पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.स्टोन क्रशरमुळे हवेत धुळीचे प्रमाण प्रचंड वाढते. ब्लास्टिंग प्रक्रियेमुळे दगडखाणीजवळील घरांना तडे जातात. वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आणि श्वसनाचे गंभीर आजार नागरिकांना जडले आहेत. पर्यावरणाच्या हानीबरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दगडखाणींना दिलेल्या परवाना क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात डोंगर पोखरले जात आहेत. जंगलतोडीमुळे हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ झाली आहे. एकूणच दगडखाणींच्या माध्यमातून भविष्यात मोठे संकट येण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत काही वर्षांपूर्वी खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील दगडखाणींच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. नियमानुसार खाणीतील खंदकांचा आकार ६ बाय ६ मीटरपेक्षा जास्त असू नये, त्याचा उतार ६० डिग्रीपेक्षा जास्त असता कामा नये, असे असताना खाणमालक मात्र सर्रास नियमांपेक्षा जास्त प्रमाणात खाणकाम करीत असतात. स्टोन क्रशर असेल तर त्याची परवानगी घेतली आहे किंवा नाही?, ब्लास्टिंगची प्रक्रिया होत असेल तर त्याची परवानगी आहे किंवा नाही? खाण परिसरातील प्रदूषण नियंत्रणात असल्याची तपासणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करून घेतली आहे किंवा नाही? आदी बाबींची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली होती. याअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दगडखाणींना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या, तर नवी मुंबईतील सहा दगडखाणींचे परवाने रद्द करण्यात आले होते. याविरोधात दगडखाण मालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात अंबरनाथ येथे राहणाऱ्या पर्यावरणप्रेमी नाझीया साजिद जमादार यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज केला आहे. सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे अपघात होवून मजुरांचे बळी जात आहेत. याची पुराव्यानिशी माहिती या अर्जात दिली आहे.