शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: June 16, 2014 20:50 IST

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या तेल्हारा तालुक्यातील महिलेचे सिझर केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे या महिलेचा बळी गेला असून, येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी शारदा गोपाल तायडे या महिलेला प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झाल्यानंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी येथील डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्याची मागणी केली; मात्र कुणाचेही सोयरसूतक नसलेल्या येथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हलगर्जी केली. त्यामुळे या महिलेची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे घाबरलेल्या येथील डॉक्टरांनी महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा काही तासातच मृत्यू झाला. सिझरनंतर दोन दिवस उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर वेळीच उपचार केले असते, तर आज तिचा मृत्यू झाला नसता; मात्र येथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्यामुळे शारदाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केली असून, सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शारदाने एका मुलीला जन्म दिला असून, तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.**  प्रशासन पांघरूण घालणार ?जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बालकांचे मृत्यू होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गलथान कारभाराचा कळस म्हणजे मागील तीन महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या एका महिलेचे बाळच गायब झाले होते. शोध घेतल्यानंतर सदर बाळ शौचालयाच्या टाक्यात सापडल्याचे सांगण्यात आले. डीएनए चाचणी करण्यात येणार, खर्‍या बाळाचा शोध घेण्यात येणार, या प्रकारचे आश्वासन त्यावेळी महिलेच्या नातेवाइकांना दिले; मात्र प्रकरण दडपण्यात आले. त्यानंतर पातूर येथील एका महिलेच्या पोटात प्रसूतीनंतर कापसाचा बोळा ठेवण्यात आला होता. सोमवारी एका महिलेचा येथील डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि हलगर्जीमुळे मृत्यू झाला असून, या प्रकरणावरही येथील वैद्यकीय अधीक्षिका पांघरूण घालणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.