शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरने घेतला महिलेचा बळी

By admin | Updated: June 16, 2014 20:50 IST

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे सिझर केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या तेल्हारा तालुक्यातील महिलेचे सिझर केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे या महिलेचा बळी गेला असून, येथील डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील रहिवासी शारदा गोपाल तायडे या महिलेला प्रसूतीसाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी प्रसूती झाल्यानंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी येथील डॉक्टरांची भेट घेऊन तातडीने उपचार करण्याची मागणी केली; मात्र कुणाचेही सोयरसूतक नसलेल्या येथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यास हलगर्जी केली. त्यामुळे या महिलेची प्रकृती आणखीनच खालावली. त्यामुळे घाबरलेल्या येथील डॉक्टरांनी महिलेला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेचा काही तासातच मृत्यू झाला. सिझरनंतर दोन दिवस उपचार करण्यास टाळाटाळ केल्याने या महिलेचा मृत्यू झाला असून, या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर वेळीच उपचार केले असते, तर आज तिचा मृत्यू झाला नसता; मात्र येथील डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्यामुळे शारदाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी आरोग्य उपसंचालकांकडे केली असून, सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शारदाने एका मुलीला जन्म दिला असून, तिची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.**  प्रशासन पांघरूण घालणार ?जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला व बालकांचे मृत्यू होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. गलथान कारभाराचा कळस म्हणजे मागील तीन महिन्यांपूर्वी प्रसूती झालेल्या एका महिलेचे बाळच गायब झाले होते. शोध घेतल्यानंतर सदर बाळ शौचालयाच्या टाक्यात सापडल्याचे सांगण्यात आले. डीएनए चाचणी करण्यात येणार, खर्‍या बाळाचा शोध घेण्यात येणार, या प्रकारचे आश्वासन त्यावेळी महिलेच्या नातेवाइकांना दिले; मात्र प्रकरण दडपण्यात आले. त्यानंतर पातूर येथील एका महिलेच्या पोटात प्रसूतीनंतर कापसाचा बोळा ठेवण्यात आला होता. सोमवारी एका महिलेचा येथील डॉक्टरांच्या चुकीमुळे आणि हलगर्जीमुळे मृत्यू झाला असून, या प्रकरणावरही येथील वैद्यकीय अधीक्षिका पांघरूण घालणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.