शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!

By admin | Updated: June 2, 2017 04:20 IST

विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी येवल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर हजारो लीटर दूध रस्त्यांवर ओतले. या आंदोलनाचे लोण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पोहोचल्याने उद्यापासून भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही संपात सहभागी झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले. रस्तोरस्ती भाजीपाल्याचे ढीग दिसत होते आणि दुधाचे पाट वाहत होते.नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्यात आल्याने पोलिसांना काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता डाळिंबी, कांदे, आंबे, बटाटे रस्त्यावर फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. जमाव नियंत्रणाबाहेर असल्याने राज्य राखीव दलास पाचारण करण्यात आले. शेतकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. त्यास प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मोफत दूध देऊन आंदोलकांनी ‘गांधीगिरी’ केली़ संपकरी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर ओतल्याने रस्त्यावर दुधाचे पाट वाहत होते. विदर्भातही तीव्र पडसादशेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.काय आहेत मागण्याशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने १ जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. तशी घोषणा बुधवारी पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे केली होती. नगर, नाशिक, औरंगाबादेतून सुरू झालेल्या या आंदोलनाला बघताबघता राज्यव्यापी स्वरुप प्राप्त झाले.पुणे मार्केट यार्डात आवक घटलीशेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे गुरुवारी भाजीपाल्याची आवक ४० टक्क्यांनी घटली. त्यामुळे टोमॅटो, भुईमूग, हिरवी मिरची वगळता इतर सर्व फळभाजी व पालेभाज्यांच्या दरात १० ते ३० टक्के वाढ झाली. शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक आणखी घटणार असल्याने भाजीपाल्याचे दर भडकतील, अशी शक्यता यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आडते असोसिएशनने शेतकऱ्यांच्या संंपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्केट यार्डात सकाळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेला कुलूप अमळनेर येथे रास्ता रोको करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेत जाऊन तिथे कुलूप ठोकले. पीक कर्ज मिळत नसल्याने हे कुलूप लावण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.