शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

दोन दिवसाआड एकाचा बळी

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच वर्षात अपघातांमुळे ९०० मृत्यू

प्रकाश वराडकर -रत्नागिरी --रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सव्वापाच वर्षांत झालेल्या एकूण ४५७७ रस्ते अपघातात ९०० जणांचा बळी गेला असून त्यात ७३८ पुरुष व १६२ महिलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २०१३ या वर्षाच्या तुलनेत २०१४ मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चौपदरीकरणानंतर महामार्गावरील अपघात कमी होऊन जीवितहानीचे प्रमाणही कमी होणार आहे. २०१० मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या ७८ प्राणांतिक अपघातांत ९१ पुरुष व १७ महिला मिळून १०८ जणांचा मृत्यू झाला होता. २०११ मध्ये महामार्गावर ६९ अपघातात ७१ पुरुष व १६ महिलांसह ८७ जण दगावले होते. २०१२ मध्ये ८१ अपघातांत ८४ पुरुष व १७ महिलांसह १०१ जणांचा बळी गेला. २०१३ मध्ये ७४ अपघातात १०८ पुरुष व २२ महिला मिळून १३० जण मृत्यूमुखी पडले होते. २०१४ मध्ये महामार्गावर झालेल्या ९२ अपघातांत ८७ पुरुष, २३ महिलांसह ११० जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१५ या तीन महिन्यांच्या काळात महामार्गावर १४ प्राणांतिक अपघातात १५ पुरुष व ३ महिलांसह १८ जण दगावले आहेत. आता त्यात त्यात आज बुधवारी राजापूरमध्ये झालेल्या अपघातातील चार बळींची वाढ झाली आहे.जिल्ह्यात गंभीर दुखापत झालेल्या रस्ते अपघातांची संख्याही मोठी आहे. २०१० मध्ये जिल्ह्यात दुखापत असलेले १८६ अपघात झाले. त्यात ४१४ जण गंभीर जखमी झाले. २०११ मध्ये १८० गंभीर अपघातात ३९९ जण जखमी झाले. २०१२ मध्ये १७६ गंभीर अपघातात ३९६ जण जखमी झाले. २०१३ मध्ये २०२ अपघातात ३९१ जण जखमी झाले. २०१४ मध्ये २०५ गंभीर अपघातात ५६५ जण जखमी झाले. जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यात ६९ गंभीर अपघातात १२२ जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्ग हा आता ‘हायवे’ ऐवजी ‘डायवे’ होऊ लागल्याने वाहनचालकांत चिंता पसरली आहे.चौपदरीकरणापुढे अडथळा शर्यतगेल्या पाच वर्षांचा जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेता रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. तसेच गेल्या अनेक दशकांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा विषय रखडला होता. आता गेल्या सहा महिन्यांपासून या विषयाला चालना मिळाली आहे. मात्र, चौपदरीकरणाच्या जमिन मोजणी प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण होत असल्याने चौपदरीकरणाचे काम मंजूर असले तरी ते पूर्ण होण्यासाठी किती काळ लागणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा अनेक ठिकाणी अरूंद आहे. महामार्ग अरूंद असला तरीही बाहेरून येणारे वाहनचालक वेगाने गाडी चालवतात. विशेष म्हणजे या वाहनचालकांना रस्त्याची, रस्त्यावरील मोठमोठ्या वळणांची काहीच माहिती नसते. त्यातच अरूंद रस्ता असल्याने अपघात होतात आणि या अपघातांची तीव्रताही मोठी असते. त्यामुळे अपघातात जिवितहानी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. सध्या महामार्गावर अवजड वाहतुकीचाही बोजा आहे.वर्ष अपघात मृत्यू मृत्यू एकूण (पुरुष)(महिला)मृत्यू२०१५१४१५३१८(जानेवारी ते मार्च २०१५) २०१४९२८७२३११०२0१३७४१०८२२१३०२0१२८१८४१७१०१२०११८९७११६८७२०१०७८९११७१०८