शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
2
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
3
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
4
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
5
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
6
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
7
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
8
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
9
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
10
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
11
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
12
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
13
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
14
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
15
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
16
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
17
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
18
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
19
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
20
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन

दोन दिवसाआड एकाचा बळी

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच वर्षात अपघातांमुळे ९०० मृत्यू

प्रकाश वराडकर -रत्नागिरी --रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या सव्वापाच वर्षांत झालेल्या एकूण ४५७७ रस्ते अपघातात ९०० जणांचा बळी गेला असून त्यात ७३८ पुरुष व १६२ महिलांचा समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावर २०१३ या वर्षाच्या तुलनेत २०१४ मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. चौपदरीकरणानंतर महामार्गावरील अपघात कमी होऊन जीवितहानीचे प्रमाणही कमी होणार आहे. २०१० मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या ७८ प्राणांतिक अपघातांत ९१ पुरुष व १७ महिला मिळून १०८ जणांचा मृत्यू झाला होता. २०११ मध्ये महामार्गावर ६९ अपघातात ७१ पुरुष व १६ महिलांसह ८७ जण दगावले होते. २०१२ मध्ये ८१ अपघातांत ८४ पुरुष व १७ महिलांसह १०१ जणांचा बळी गेला. २०१३ मध्ये ७४ अपघातात १०८ पुरुष व २२ महिला मिळून १३० जण मृत्यूमुखी पडले होते. २०१४ मध्ये महामार्गावर झालेल्या ९२ अपघातांत ८७ पुरुष, २३ महिलांसह ११० जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०१५ ते ३१ मार्च २०१५ या तीन महिन्यांच्या काळात महामार्गावर १४ प्राणांतिक अपघातात १५ पुरुष व ३ महिलांसह १८ जण दगावले आहेत. आता त्यात त्यात आज बुधवारी राजापूरमध्ये झालेल्या अपघातातील चार बळींची वाढ झाली आहे.जिल्ह्यात गंभीर दुखापत झालेल्या रस्ते अपघातांची संख्याही मोठी आहे. २०१० मध्ये जिल्ह्यात दुखापत असलेले १८६ अपघात झाले. त्यात ४१४ जण गंभीर जखमी झाले. २०११ मध्ये १८० गंभीर अपघातात ३९९ जण जखमी झाले. २०१२ मध्ये १७६ गंभीर अपघातात ३९६ जण जखमी झाले. २०१३ मध्ये २०२ अपघातात ३९१ जण जखमी झाले. २०१४ मध्ये २०५ गंभीर अपघातात ५६५ जण जखमी झाले. जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यात ६९ गंभीर अपघातात १२२ जण जखमी झाले. मुंबई गोवा महामार्ग हा आता ‘हायवे’ ऐवजी ‘डायवे’ होऊ लागल्याने वाहनचालकांत चिंता पसरली आहे.चौपदरीकरणापुढे अडथळा शर्यतगेल्या पाच वर्षांचा जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेता रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. तसेच गेल्या अनेक दशकांपासून मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा विषय रखडला होता. आता गेल्या सहा महिन्यांपासून या विषयाला चालना मिळाली आहे. मात्र, चौपदरीकरणाच्या जमिन मोजणी प्रक्रियेत अनेक अडथळे निर्माण होत असल्याने चौपदरीकरणाचे काम मंजूर असले तरी ते पूर्ण होण्यासाठी किती काळ लागणार, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.मुंबई-गोवा महामार्ग हा अनेक ठिकाणी अरूंद आहे. महामार्ग अरूंद असला तरीही बाहेरून येणारे वाहनचालक वेगाने गाडी चालवतात. विशेष म्हणजे या वाहनचालकांना रस्त्याची, रस्त्यावरील मोठमोठ्या वळणांची काहीच माहिती नसते. त्यातच अरूंद रस्ता असल्याने अपघात होतात आणि या अपघातांची तीव्रताही मोठी असते. त्यामुळे अपघातात जिवितहानी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते. सध्या महामार्गावर अवजड वाहतुकीचाही बोजा आहे.वर्ष अपघात मृत्यू मृत्यू एकूण (पुरुष)(महिला)मृत्यू२०१५१४१५३१८(जानेवारी ते मार्च २०१५) २०१४९२८७२३११०२0१३७४१०८२२१३०२0१२८१८४१७१०१२०११८९७११६८७२०१०७८९११७१०८