शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही होरपळला!, खान्देशात उष्माघाताचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 06:14 IST

उष्णतेच्या लाटेने सलग दुसºया दिवशी सोमवारी महाराष्ट्र होरपळून निघाला. जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकºयाचा मृत्यू झाला.

मुंबई/पुणे: उष्णतेच्या लाटेने सलग दुसºया दिवशी सोमवारी महाराष्ट्र होरपळून निघाला. जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकºयाचा मृत्यू झाला. मुंबईसह खान्देश, विदर्भ, मराठवाड्याला चटके बसले. सर्वाधिक तापमान भिरा येथे तब्बल ४५ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. त्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये ४१.१ एवढे तापमान होते. पुढील तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ३७ आणि ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला.सांताक्रूझला रविवारी सर्वाधिक ४१ अंश तापमान नोंद झाले होते. त्यात ३८.७ अंशांपर्यंत घट झाली. सर्वाधिक पाऊस व तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या भिरा येथील पारा सरासरी पेक्षा तब्बल ६.३ अंशानी वाढून ४५ अंशावर स्थिरावला. खान्देशही भाजून निघाला असून जळगावचा पारा ४०.४ अंशावर होता. वासुदेव पाटील (५२, रा. म्हसवे ता. पारोळा) या शेतकºयाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मालेगाव ४०.२, नाशिक ३८.१ असे तापमान नोंदले गेले. बागायती पश्चिम महाराष्ट्रालाही झळ बसली. सांगली३९.२, कोल्हापूर ३७.२, सोलापूर ३९.९ असे तापमान होते.मराठवाड्यात उस्मानाबाद येथे ३९, औरंगाबाद ३८.३ आणि परभणीचा पारा ४०.४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. विदर्भात अकोला येथे सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमरावती ३९.८, चंद्रपूर ४०.२, नागपूर ३९.४, वाशीम ३९.४, वर्धा ४० अणि यवतमाळचे तापमान ३९.५ अंश नोंदविण्यात आले.हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.पूर्वेकडून येत असणाºया उष्ण वाºयामुळे राज्य आणि मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. शिवाय अरबी समुद्राकडून मुंबईकडे वाहणारे खारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. दुपारी हे वारे स्थिर होत असल्याने ते तापत आहेत. परिणामी तप्त वाºयामुळे पारा वाढला आहे. मंगळवारीही मुंबईचे वातावरण असेच राहील.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग