शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

महाराष्ट्र दुसऱ्या दिवशीही होरपळला!, खान्देशात उष्माघाताचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 06:14 IST

उष्णतेच्या लाटेने सलग दुसºया दिवशी सोमवारी महाराष्ट्र होरपळून निघाला. जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकºयाचा मृत्यू झाला.

मुंबई/पुणे: उष्णतेच्या लाटेने सलग दुसºया दिवशी सोमवारी महाराष्ट्र होरपळून निघाला. जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकºयाचा मृत्यू झाला. मुंबईसह खान्देश, विदर्भ, मराठवाड्याला चटके बसले. सर्वाधिक तापमान भिरा येथे तब्बल ४५ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. त्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये ४१.१ एवढे तापमान होते. पुढील तीन दिवस कमाल तापमानाचा पारा ३७ आणि ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला.सांताक्रूझला रविवारी सर्वाधिक ४१ अंश तापमान नोंद झाले होते. त्यात ३८.७ अंशांपर्यंत घट झाली. सर्वाधिक पाऊस व तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या भिरा येथील पारा सरासरी पेक्षा तब्बल ६.३ अंशानी वाढून ४५ अंशावर स्थिरावला. खान्देशही भाजून निघाला असून जळगावचा पारा ४०.४ अंशावर होता. वासुदेव पाटील (५२, रा. म्हसवे ता. पारोळा) या शेतकºयाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मालेगाव ४०.२, नाशिक ३८.१ असे तापमान नोंदले गेले. बागायती पश्चिम महाराष्ट्रालाही झळ बसली. सांगली३९.२, कोल्हापूर ३७.२, सोलापूर ३९.९ असे तापमान होते.मराठवाड्यात उस्मानाबाद येथे ३९, औरंगाबाद ३८.३ आणि परभणीचा पारा ४०.४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. विदर्भात अकोला येथे सर्वाधिक ४०.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमरावती ३९.८, चंद्रपूर ४०.२, नागपूर ३९.४, वाशीम ३९.४, वर्धा ४० अणि यवतमाळचे तापमान ३९.५ अंश नोंदविण्यात आले.हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.पूर्वेकडून येत असणाºया उष्ण वाºयामुळे राज्य आणि मुंबईच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. शिवाय अरबी समुद्राकडून मुंबईकडे वाहणारे खारे वारे स्थिर होण्यास दुपार होत आहे. दुपारी हे वारे स्थिर होत असल्याने ते तापत आहेत. परिणामी तप्त वाºयामुळे पारा वाढला आहे. मंगळवारीही मुंबईचे वातावरण असेच राहील.- शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग