शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

कुलगुरूंनी प्राचार्यांसमोर जोडले हात

By admin | Updated: July 8, 2017 04:26 IST

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कंबर कसली असून, बैठकांवर बैठकांचे आयोजन सध्या विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी उत्तरपत्रिका तपासणीला वेग यावा म्हणून प्राचार्यांना भावनिक आवाहन केले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सूचनेनुसार काम करण्यासाठी प्राचार्यांना समजावून सांगण्यात आले. पण, प्रश्न विचारण्याची संधी दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जून महिना संपल्यावरही मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले नसल्याने राज्यपालांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले. विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आता मुंबई विद्यापीठ कामाला लागले आहे. शाखानिहाय निकालांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकीकडे जोरदार प्रयत्न सुरूअसताना सर्व्हर साथ देत नसल्याचे उघड झाले आहे. मुंबईसह सिंधुदुर्ग रत्नागिरीतील अनेक महाविद्यालयांत सर्व्हरचा गोंधळ उडाल्याची तक्रार प्राचार्यांकडून करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर जाहीर व्हावेत म्हणून कुलगुरूंच्या संकल्पनेतून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी यंदापासून सुरू करण्यात आली आहे. पण, ही प्रक्रिया सुरू करतानाच अनेक प्रश्न निर्माण झाले होते. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा राबवावी लागली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी उशिरा सुरू झाली. आता त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होताना दिसत आहे. पण, आता ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करायचे असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. आॅनलाइन तपासणी चांगल्या पद्धतीने आणि लवकर पूर्ण व्हावी यासाठी मिठीबाई महाविद्यालयाचे प्रा. विनायक दळवी यांची विशेष नियुक्ती केली आहे. दळवी यांनी सध्या या पदाचा कारभार स्वीकारला नसला तरी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या कामाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी झालेल्या अभ्यास मंडळाच्या बैठकीला कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यासह विनायक दळवी, विविध शाखांचे डीन आणि परीक्षा मंडळाचे विशेष अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आवश्यक त्या सर्व सूचना करण्यात आल्या. निकाल वेळेत लावावा यासाठी विद्यापीठाने प्राचार्यांची विशेष मदत घेण्यास सुरुवात केली असून, कॉमर्स कॉलेजातील निकालाची जबाबदारी प्राचार्यांनी वाटून दिल्याने निकाल वेळेवर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील प्राध्यापकांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पेपर अपलोड होण्यात गोंधळ ३१ जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. पण, सर्व्हर डाऊन होत असल्याने शुक्रवारी मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या महाविद्यालयांना त्रास झाला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीकडून उत्तरपत्रिका अपलोड करण्यास काही समस्या येत आहेत. त्यामुळे रात्रीच उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.