शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विहिंप, बजरंग दलाची आदळआपट

By admin | Updated: September 8, 2016 02:47 IST

गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे.

भार्इंदर : गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर कमानी व केलेली बॅनरबाजी याविरोधात मीरा-भार्इंदर पालिकेने धडक कारवाई सुरू केल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा पापड मोडला आहे. युतीच्या सत्ताकाळात हिंदूंच्या सणानिमित्त लावलेल्या बॅनर, कमानींवर होत असलेल्या कारवाईविरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांसह भाजपा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर गीता जैन यांची बुधवारी भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.न्यायालयाच्या आदेशानुसार बेकायदेशीर बॅनर, रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या कमानींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हे बॅनर्स व कमानी यांचा थेट संबंध गणेशोत्सव मंडळांच्या निधी संकलनाशी असल्याने व त्यालाच फटका बसल्याने अनेक गणेश मंडळांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बॅनर व कमानी लावल्याने गणेश मंडळांना निधी मिळत असल्याने किमान उत्सवाच्या काळात तरी कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांकडे केली. पालिकेच्या कारवाईला हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कारवाईचा जाब विचारण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे किशोर बन्सल, प्रेमचंद दुबे, गौरव सिंग, बजरंग दलाचे व भाजपा नगरसेवक डॉ. सुशील अग्रवाल, आशीष यादव, भाजपा सृष्टी मंडळाचे गजानन नागे, अशोक तोर, शिवसेनेचे सूर्यकांत भोईर यांच्या शिष्टमंडळाने महापौर गीता जैन व आयुक्त डॉ. नरेश गीते यांची बुधवारी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मुंबई व ठाणे मनपा हद्दीत गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात बॅनर्स व कमानी लावण्यात आल्या असून तेथील स्थानिक प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले. मीरा-भार्इंदर मनपा मात्र परवानगी देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शहरात व राज्यात युतीची सत्ता असतानाही हिंदूंच्या सणात कारवाईचे विघ्न जाणीवपूर्वक आणले जात असल्याचा आरोप विहिंप व बजरंग दल यांनी केला. महापौर जैन यांनी कायद्यावर बोट ठेवून मीरा-भार्इंदर पालिका न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत असून कारवाई सुरूच राहील, असे ठामपणे सांगितले. शिष्टमंडळाने दिलेले निवेदन पालिकेमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल, असे मोघम उत्तर आयुक्त डॉ. गीते यांनी दिले. (प्रतिनिधी)