शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
2
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
3
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
4
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
5
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
6
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
7
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
8
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
9
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
10
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
11
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
12
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
13
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
14
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
15
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
16
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
17
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
18
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
19
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
20
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले

नाझरे जलाशयात अत्यल्प पाणीसाठा

By admin | Updated: November 4, 2016 01:20 IST

वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला.

जेजुरी : या वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला. यामुळे या वर्षभरात पाण्याचे नियोजन आजपासूनच करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने या जलाशयात या वर्षी पाणीसाठा कमीच उपलब्ध झाला आहे. जलाशयात केवळ ४० टक्केच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. आता पावसाळाही संपला असून, पावसाची शक्यताही राहिलेली नाही. यामुळे उपलब्ध पाणी वर्षभर वापरावे लागणार आहे. पूर्व पुरंदर आणि पश्चिम बारामती तालुक्यातील सुमारे सव्वालाख लोकसंख्येला वर्षभर पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचे नियोजन आता गरजेचे बनलेले आहे. नाझरे जलाशयात केवळ ३२१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, त्यातील १२२ दशलक्ष पाणीसाठा उपयुक्त मानला जातो. नाझरे जलाशयावरून मोरगाव व १६ गावे, पारगाव व २३ गावे, नाझरे व ५ गावे, जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आई. एस. एम. टी. कंपनीसह सुमारे ५० गावे व वाड्यावस्त्या, त्याचबरोबर जलाशयावरील एकूण १७० शेती सिंचन योजना आणि पुरंदर तालुक्यातील १४०० हेक्टर आणि बारामती तालुक्यातील १७०० हेक्टर क्षेत्राला दोन आवर्तनाद्वारे शेतीलाही पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असल्याने हे शक्य होते. मात्र, जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्याने आता शेतीला पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. उपयुक्त पाणीसाठ्यातील एकूण ५० गावांना पिण्याचे पाणी दररोज बारा तास दिले जात असल्याने ते वर्षभर पुरवावे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय भरलेला असेल, तर शेती सिंचन योजनांना वर्षाकाठी ५० ते ६० दशलक्ष घनफूट व बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ३१०० हेक्टरसाठी खरीप व रब्बी हंगाम आवर्तनाद्वारे १५० ते १८० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा दिला जातो. वर्षभरात साधारणपणे ८० ते १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होते. उर्वरित पाण्यापैकी मृत साठा २०० दशलक्ष सोडून इतर पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना दिला जातो. अशी साधारण येथील नियोजनाची पद्धत आहे. यंदा मात्र पाणीसाठाच निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. (वार्ताहर)>नाझरे जलाशयावरून फक्त पिण्याच्याच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. जलाशयावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा आणि जेजुरी व औद्योगिक क्षेत्रासाठीच पाणी राखण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणी दिले जाणार नसून, त्यासाठी महावितरणच्या सहकार्याने या परिसरातील वीजपुरवठा करणारे सर्व विद्युत जनित्र (डी. पी.) तील विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पाण्याची चोरीही होऊ शकणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवलेली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यापर्यंत यंदा पिण्याच्या पाण्यासाठीच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. - नीरज नागोसे, शाखाधिकारी, नाझरे जलाशय>या वर्षी जलाशयातील आजचा पाणीसाठा केवळ ३२२ दशलक्ष घनफूट आहे. पैकी २०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता केवळ १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच उपयोगात आणावा लागणार आहे. त्या पाण्याचे नियोजन आतापासून न केल्यास उन्हाळ्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर राहणार आहे.