शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नाझरे जलाशयात अत्यल्प पाणीसाठा

By admin | Updated: November 4, 2016 01:20 IST

वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला.

जेजुरी : या वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला. यामुळे या वर्षभरात पाण्याचे नियोजन आजपासूनच करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने या जलाशयात या वर्षी पाणीसाठा कमीच उपलब्ध झाला आहे. जलाशयात केवळ ४० टक्केच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. आता पावसाळाही संपला असून, पावसाची शक्यताही राहिलेली नाही. यामुळे उपलब्ध पाणी वर्षभर वापरावे लागणार आहे. पूर्व पुरंदर आणि पश्चिम बारामती तालुक्यातील सुमारे सव्वालाख लोकसंख्येला वर्षभर पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचे नियोजन आता गरजेचे बनलेले आहे. नाझरे जलाशयात केवळ ३२१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, त्यातील १२२ दशलक्ष पाणीसाठा उपयुक्त मानला जातो. नाझरे जलाशयावरून मोरगाव व १६ गावे, पारगाव व २३ गावे, नाझरे व ५ गावे, जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आई. एस. एम. टी. कंपनीसह सुमारे ५० गावे व वाड्यावस्त्या, त्याचबरोबर जलाशयावरील एकूण १७० शेती सिंचन योजना आणि पुरंदर तालुक्यातील १४०० हेक्टर आणि बारामती तालुक्यातील १७०० हेक्टर क्षेत्राला दोन आवर्तनाद्वारे शेतीलाही पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असल्याने हे शक्य होते. मात्र, जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्याने आता शेतीला पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. उपयुक्त पाणीसाठ्यातील एकूण ५० गावांना पिण्याचे पाणी दररोज बारा तास दिले जात असल्याने ते वर्षभर पुरवावे लागणार आहे. पूर्ण क्षमतेने जलाशय भरलेला असेल, तर शेती सिंचन योजनांना वर्षाकाठी ५० ते ६० दशलक्ष घनफूट व बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ३१०० हेक्टरसाठी खरीप व रब्बी हंगाम आवर्तनाद्वारे १५० ते १८० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा दिला जातो. वर्षभरात साधारणपणे ८० ते १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होते. उर्वरित पाण्यापैकी मृत साठा २०० दशलक्ष सोडून इतर पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना दिला जातो. अशी साधारण येथील नियोजनाची पद्धत आहे. यंदा मात्र पाणीसाठाच निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. (वार्ताहर)>नाझरे जलाशयावरून फक्त पिण्याच्याच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. जलाशयावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा आणि जेजुरी व औद्योगिक क्षेत्रासाठीच पाणी राखण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणी दिले जाणार नसून, त्यासाठी महावितरणच्या सहकार्याने या परिसरातील वीजपुरवठा करणारे सर्व विद्युत जनित्र (डी. पी.) तील विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पाण्याची चोरीही होऊ शकणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवलेली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यापर्यंत यंदा पिण्याच्या पाण्यासाठीच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. - नीरज नागोसे, शाखाधिकारी, नाझरे जलाशय>या वर्षी जलाशयातील आजचा पाणीसाठा केवळ ३२२ दशलक्ष घनफूट आहे. पैकी २०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता केवळ १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच उपयोगात आणावा लागणार आहे. त्या पाण्याचे नियोजन आतापासून न केल्यास उन्हाळ्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर राहणार आहे.