शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

भाज्यांनी गाठली शंभरी

By admin | Updated: June 9, 2016 03:38 IST

उन्हाळा लांबल्याचा परिणाम भाज्यांवर झाला असून पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली आहे.

ठाणे : उन्हाळा लांबल्याचा परिणाम भाज्यांवर झाला असून पाण्याच्या कमतरतेमुळे बहुतांश भाज्यांनी शंभरी गाठली आहे. टोमॅटो, कारले, मिरची, कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा यांचे दर अव्वाच्यासव्वा वाढले आहेत. परिणामी, ग्राहकांची मागणी असली तरी खरेदीचे प्रमाण मात्र चांगलेच घटले असल्याची चिंता भाजीविक्रेत्यांनी व्यक्त केली. पाण्याचा भीषण दुष्काळ आणि अद्याप पावसाची चिन्हे नसल्याने भाज्या चांगल्याच कडाडल्या आहे. एरव्ही, ४० ते ६० रुपये किलो दराने मिळणाऱ्या भाज्यांनी शंभरीचा पल्ला गाठला आहे, तर अनेकांनी शंभरीदेखील ओलांडली आहे. दुधी, कोबी आणि लालभोपळा या भाज्या सोडल्या, तर बाकी सर्वच भाज्यांना महागाईची झळ पोहोचली आहे. त्यामुळे एक किलो भाजी घेणारा ग्राहक आता पाव किलो खरेदी करू लागला आहे. वाढत्या दरामुळे ग्राहक भाजी खरेदी करताना हात आखडता घेत असल्याने भाज्यांची आवकही घटून ५० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे मोजकाच माल आणण्यावर आमचा भर असतो, असे भाजीविक्रेते विवेक भुजबळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोथिंबिरीचा दर चौपट वाढला आहे. १० ते १५ रुपयांना मिळणारी जुडी आता ६० रुपयांना विकली जात आहे. (प्रतिनिधी)>फळभाज्यांबरोबर पालेभाज्यांचेही दर वधारले आहेत. मेथी सर्वाधिक महागडी झाली आहे. पाण्याअभावी दर कडाडले आहेत. - जयवंत चिपाडे, पालेभाजीविक्रेते>भाज्यांचे वाढलेले दर पाहता ग्राहक भाज्यांची खरेदी करतील की नाही, याबाबत शंकाच असते. त्यामुळे आम्ही मोजकाच माल आणतो. लागलीच भाज्यांचे दर कमी होणार नाही. - विवेक भुजबळ, गावदेवी मार्केट